शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

यंदाही गणेशोत्सवाच्या मिरवणुका नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी गणेशोत्सवासंबंधी नियम जाहीर केले असून घरगुती गणेशमूर्तींना दोन फुटांची व सार्वजनिक मंडळांच्या ...

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी गणेशोत्सवासंबंधी नियम जाहीर केले असून घरगुती गणेशमूर्तींना दोन फुटांची व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना दोन फुट उंचीची मर्यादा घालून दिली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत व कोरोना नियमांचे पालन करत व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर केल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यासाठीच्या नियमांचा आदेश काढण्यात आला. त्यानुसार मंडळांनी नागरिकांना वर्गणी मागू नये, कोणी स्वेच्छेने दिली तर घ्यावी, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मांडव मर्यादित स्वरूपात उभारून सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. मंडळांची गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंतच असावी. मूर्ती शाडूची असल्यास त्याचे घरीच करावे. ते शक्य नसल्यास कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात यावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य उपक्रम, शिबिरे घेवून त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांबाबत जागृती करण्यात यावी. ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या नियमात गणेशोत्सवानिमित्त शिथिलता दिली जाणार नाही. आरती, भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम घेताना गर्दी तसेच ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.

भक्तांच्या सोयीसाठी श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे करावी, मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करा. भाविकांसाठी शारीरिक अंतर, मास्क,सॅनिटायझर हे नियमांचे पालन करण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.

----

उंचीवर बंधने नकोत..

काही कुंभारांनी ४ फुटांवरील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत, त्यामुळे मूर्तीच्या उंचीवर बंधने घालू नयेत, अशी मागणी कुंभार समाजाने केली होती. मात्र गेल्यावर्षी शासनाने हा नियम घालून दिला असून त्यात यंदादेखील बदल केेलेला नाही. त्यामुळे ज्यांनी जास्त उंचीच्या मूर्ती बनवल्या आहेत, त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

--