शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

‘एफएसआय’ वाढवून दिला तरी प्रश्न सुटणार आहे का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST

कोल्हापूर : शहरात यापूर्वी पूरक्षेत्रातील बांधकामांना काही अटी घालून बांधकाम परवानगी दिली खरी, पण पुढे त्या अटींचे पालन झाले ...

कोल्हापूर : शहरात यापूर्वी पूरक्षेत्रातील बांधकामांना काही अटी घालून बांधकाम परवानगी दिली खरी, पण पुढे त्या अटींचे पालन झाले नाही. भराव टाकले गेले, पार्किंगच्या जागेत गोदामे झाली. त्यामुळे तेथील पुराचे पाणी आता शहराच्या अन्य भागांत शिरायला लागले. त्यामुळे शाहुपुरी भागातील नागरिकांनी ‘एफएसआय’ वाढवून देण्याची केलेली मागणी व्यावहारिक ठरेल का आणि पुराचे पाणी घरात शिरण्याचा मूळ प्रश्न सुटेल का, यावर तज्ज्ञांकडून अभ्यास झाला पाहिजे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी शाहुपुरीतील पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्याकडे काही मागण्या केल्या. त्यातील प्रमुख मागणी ‘एफएसआय’ वाढवून देण्याची आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला महानगरपालिका प्रशासनाने हा प्रश्न समजावून सांगितला आणि ‘एफएसआय’ वाढवून देण्याचे महत्त्व पटवून दिला तर ही मागणी लगेच मान्य होईल. परंतु त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार आहे का आणि निर्णयानंतर नागरिक बंधने पाळतील का, याचाही विचार आवश्यक आहे.

यापूर्वी पूरक्षेत्रात असा प्रयोग झाला आहे. पूरक्षेत्रातील बांधकामांना निर्बंध आले तेव्हा पळवाटा शोधणाऱ्या अनेक बिल्डर्सनी तसेच त्यांच्या प्रयत्नांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी काम करताना काही अटी घालून दिल्या. कोणत्याही प्रकारचा भराव टाकायचा नाही आणि तळमजला हा केवळ पार्किंगसाठी राखीव ठेवायचा त्यावर अन्य कुठलेही बांधकाम करायचे नाही, अशा दोन अटी घालण्यात आल्या. बांधकाम परवानगी दिल्यानंतर या अटी पाळल्या आहेत किंवा नाहीत, याची कोणीही जाऊन साधी पाहणी केली नाही, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांना मज्जाव केला नाही. त्याचे परिणाम आता शाहुपुरी, शुक्रवारपेठ, सिद्धार्थनगर, नागाळा पार्क, महावीर काॅलेज, रमणमळा, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी परिसरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.

पुन्हा त्याच चुका करायच्या का?

यापूर्वी पूरक्षेत्रातील बांधकामे देताना ज्या चुका केल्या त्याच चुका परत शाहुपुरीतील नागरिकांची मागणी विचारात घेताना करायच्या का, हा प्रश्न आहे. जरी ‘एफएसआय’ वाढवून दिला तरी तळमजल्यावर बांधकाम होणार नाही याची खबरदारी कोण घेणार, महापालिका त्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणार का, या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मागणी मान्य करणे धोक्याचे ठरणार आहे.

५० मीटरचे नियम तोडले

जयंती नाला शहरातील प्रमुख नाला असून नाल्याच्या काठापासून पन्नास मीटर अंतरात कोणत्याही बांधकामांना परवानगी देऊ नये, असा नियम आहे. तरीही नाल्याच्या काठावर बांधकामे झाली आहेत. अनेक कुंभारबांधवांना बापट कॅम्पमध्ये जागा देण्यात आल्या. काहींनी तिकडचा ताबा घेतला, मूळ जागी बांधकामे तशीच ठेवली आहेत. त्यांना अधिकारी, लोकप्रतिनिधींचे संरक्षण मिळाले, अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे भविष्यात ‘एफएसआय’वाढविला तरी पुराचे पाणी घरात शिरणारच आहे.

कोट -१

केवळ शाहुपुरी कुंभार गल्लीचा विचार करू नये तर जेथे जेथे पुराचे पाणी शिरते तेथील सर्वच घरांसाठी ‘एफएसआय’ वाढवून देण्याचा पर्याय होऊ शकतो. पुराचे पाणी जेथेपर्यंत येते, तेवढ्या उंचाचा तळमजला रिकामा ठेवून वरील बाजूस बांधकाम केले तरच शक्य होईल.

शशिकांत फडतारे,

निवृत्त उपसंचालक, नगररचना विभाग

कोट - २

‘एफएसआय’ वाढविला तर नुकसान टाळता येईल, पण पुराचे पाणी येणारच. पुराचे पाणी आल्यावर लाईट, पाणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद होतो. मग अशा घरात राहून तरी काय उपयोग आहे. शाहुपुरी कुंभार गल्लीचा हा कायमचाच प्रश्न आहे.

एक रहिवाशी.