शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

‘एफएसआय’ वाढवून दिला तरी प्रश्न सुटणार आहे का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST

कोल्हापूर : शहरात यापूर्वी पूरक्षेत्रातील बांधकामांना काही अटी घालून बांधकाम परवानगी दिली खरी, पण पुढे त्या अटींचे पालन झाले ...

कोल्हापूर : शहरात यापूर्वी पूरक्षेत्रातील बांधकामांना काही अटी घालून बांधकाम परवानगी दिली खरी, पण पुढे त्या अटींचे पालन झाले नाही. भराव टाकले गेले, पार्किंगच्या जागेत गोदामे झाली. त्यामुळे तेथील पुराचे पाणी आता शहराच्या अन्य भागांत शिरायला लागले. त्यामुळे शाहुपुरी भागातील नागरिकांनी ‘एफएसआय’ वाढवून देण्याची केलेली मागणी व्यावहारिक ठरेल का आणि पुराचे पाणी घरात शिरण्याचा मूळ प्रश्न सुटेल का, यावर तज्ज्ञांकडून अभ्यास झाला पाहिजे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी शाहुपुरीतील पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्याकडे काही मागण्या केल्या. त्यातील प्रमुख मागणी ‘एफएसआय’ वाढवून देण्याची आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला महानगरपालिका प्रशासनाने हा प्रश्न समजावून सांगितला आणि ‘एफएसआय’ वाढवून देण्याचे महत्त्व पटवून दिला तर ही मागणी लगेच मान्य होईल. परंतु त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार आहे का आणि निर्णयानंतर नागरिक बंधने पाळतील का, याचाही विचार आवश्यक आहे.

यापूर्वी पूरक्षेत्रात असा प्रयोग झाला आहे. पूरक्षेत्रातील बांधकामांना निर्बंध आले तेव्हा पळवाटा शोधणाऱ्या अनेक बिल्डर्सनी तसेच त्यांच्या प्रयत्नांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी काम करताना काही अटी घालून दिल्या. कोणत्याही प्रकारचा भराव टाकायचा नाही आणि तळमजला हा केवळ पार्किंगसाठी राखीव ठेवायचा त्यावर अन्य कुठलेही बांधकाम करायचे नाही, अशा दोन अटी घालण्यात आल्या. बांधकाम परवानगी दिल्यानंतर या अटी पाळल्या आहेत किंवा नाहीत, याची कोणीही जाऊन साधी पाहणी केली नाही, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांना मज्जाव केला नाही. त्याचे परिणाम आता शाहुपुरी, शुक्रवारपेठ, सिद्धार्थनगर, नागाळा पार्क, महावीर काॅलेज, रमणमळा, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी परिसरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.

पुन्हा त्याच चुका करायच्या का?

यापूर्वी पूरक्षेत्रातील बांधकामे देताना ज्या चुका केल्या त्याच चुका परत शाहुपुरीतील नागरिकांची मागणी विचारात घेताना करायच्या का, हा प्रश्न आहे. जरी ‘एफएसआय’ वाढवून दिला तरी तळमजल्यावर बांधकाम होणार नाही याची खबरदारी कोण घेणार, महापालिका त्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणार का, या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मागणी मान्य करणे धोक्याचे ठरणार आहे.

५० मीटरचे नियम तोडले

जयंती नाला शहरातील प्रमुख नाला असून नाल्याच्या काठापासून पन्नास मीटर अंतरात कोणत्याही बांधकामांना परवानगी देऊ नये, असा नियम आहे. तरीही नाल्याच्या काठावर बांधकामे झाली आहेत. अनेक कुंभारबांधवांना बापट कॅम्पमध्ये जागा देण्यात आल्या. काहींनी तिकडचा ताबा घेतला, मूळ जागी बांधकामे तशीच ठेवली आहेत. त्यांना अधिकारी, लोकप्रतिनिधींचे संरक्षण मिळाले, अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे भविष्यात ‘एफएसआय’वाढविला तरी पुराचे पाणी घरात शिरणारच आहे.

कोट -१

केवळ शाहुपुरी कुंभार गल्लीचा विचार करू नये तर जेथे जेथे पुराचे पाणी शिरते तेथील सर्वच घरांसाठी ‘एफएसआय’ वाढवून देण्याचा पर्याय होऊ शकतो. पुराचे पाणी जेथेपर्यंत येते, तेवढ्या उंचाचा तळमजला रिकामा ठेवून वरील बाजूस बांधकाम केले तरच शक्य होईल.

शशिकांत फडतारे,

निवृत्त उपसंचालक, नगररचना विभाग

कोट - २

‘एफएसआय’ वाढविला तर नुकसान टाळता येईल, पण पुराचे पाणी येणारच. पुराचे पाणी आल्यावर लाईट, पाणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद होतो. मग अशा घरात राहून तरी काय उपयोग आहे. शाहुपुरी कुंभार गल्लीचा हा कायमचाच प्रश्न आहे.

एक रहिवाशी.