शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही कडू कारल्याने आर्थिक गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

कोपार्डे : कोरोनाकाळात शेतीमालालाही दर मिळत नाही असे चित्र असताना बाजारपेठेचा अंदाज घेत वाकरे (ता. करवीर) येथील कृष्णात ...

कोपार्डे : कोरोनाकाळात शेतीमालालाही दर मिळत नाही असे चित्र असताना बाजारपेठेचा अंदाज घेत वाकरे (ता. करवीर) येथील कृष्णात पाटील या शेतकऱ्याने कारली फळभाजीची लागवड केली. अवघ्या तीन महिन्यांत १७ टन कारली उत्पादन व पाच लाख रुपये उत्पन्न कारली फळभाजीतून मिळवून शेतकऱ्यांसमोर त्यांनी आदर्श शेतीचे उदाहरण ठेवले आहे.

कृष्णात पाटील यांची स्वतःची पानस्थळ १० एकर जमीन आहे. पारंपरिक ऊसशेती करण्यावर पाटील यांचा भर असायचा; पण गेल्या तीन वर्षांपासून याला फाटा देत पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत घरगुती भाजीसाठी लागणारी कारली फळभाज्या लागवडीचा निर्णय घेतला.

या वर्षी ७ एप्रिलला व्हीएनआर या जातीच्या कारली बियाण्यांची लागवड केली. ४५ गुंठे क्षेत्रात साडेचार फूट सरी सोडून बेडवर ठिबक व पॉलिथिन पेपर टाकून लागवड करण्यात आली होती. ठिबक पद्धतीचा वापर करून पाणी, खते देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उच्चांकी कारली उत्पादन घेण्यास मदत झाली. अवघ्या तीन महिन्यांत १७ टन कारली उत्पादन मिळाले आहे. दरही ३० ते ३५ रुपये मिळाला आहे. यातून खर्च वजा जाता किमान पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनाकाळातही चांगला उठाव

कोरोनाकाळात लॉकडाऊन असतानाही घरगुती भाजीसाठी कारल्यांना मोठी मागणी आहे. त्यातच कारल्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने इतर फळभाज्यांच्या तुलनेत मोठी मागणी आहे.

दर दोन दिवसाआड ७०० ते ८०० किलो कारले उत्पादन मिळत असल्याने त्याचा तोडा व बाजार समितीत व्यापाऱ्यांना विक्री करण्याचे नियोजन करावे लागत होते; पण कुटुंबातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडल्याने कारली उत्पादनातून चांंगले उत्पन्न मिळाल्याचे पाटील सांगतात.

प्रतिक्रिया

उसाच्या शेतीत किमान दीड वर्ष जमिनीचे क्षेत्र गुंतून राहते. ऊस तुटल्यानंतरही कारखान्याकडून वेळेत ऊस बिल मिळत नाही. यामुळे कमी कालावधीत व रोख पैसे देणाऱ्या कारले उत्पादनासाठी गेली तीन वर्षे लागवड करीत आहे.

कृष्णात पाटील, शेतकरी

फोटो

वाकरे (ता. करवीर) येथील प्रगतशील शेतकरी कृष्णात पाटील यांची कारल्याची शेती. कारली तोडा झाल्यानंतर त्यांचे पॅकिंग करताना.