शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतरही कोरोना खरेदीतील दरफरक सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

कोल्हापूर : सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोविड काळातील खरेदीतील बाजारमूल्य आणि पुरवठादारांनी लावलेले दर यांतील फरकाचा अहवाल ...

कोल्हापूर : सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोविड काळातील खरेदीतील बाजारमूल्य आणि पुरवठादारांनी लावलेले दर यांतील फरकाचा अहवाल मागविला होता; मात्र सहा महिने उलटून गेले तरी जिल्हा परिषदेला हा अहवाल न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. जिल्हा परिषदेने हा चेंडू अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कोर्टात ढकलला आहे.

गतवर्षी कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यात ८० कोटींहून अधिक रुपयांची वस्तू आणि उपकरणांची खरेदी झाली. या खरेदीबाबत नागरिक आणि संघटनांनी जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन देसाई यांनी १० सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवून याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

विविध साहित्य पुरवठादारांनी मान्य करून घेतलेल्या दराची तुलना खुल्या बाजारातील दर व उत्पादन मूल्यांशी करून यामध्ये तफावत असल्यास संबंधित पुरवठादारास कोणत्याही परिस्थितीत देयके अदा करण्यात येऊ नयेत. जर अंशत: देयके अदा केली असतील तर सक्तीने वसुली करावी, ठेकेदारांनी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खरेदी केलेल्या साहित्याचा विनियोग योग्य रीतीने झाला नसल्यास त्याबाबतची जबाबदारी निश्चित करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले होते.

चौकट

अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष

जिल्हाधिकाऱ्यांचे हे पत्र मिळताच त्यांनी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्तांना याबाबत पत्र लिहून याबाबत पडताळणी करण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर या विभागाने कोणतेही लेखी उत्तर जिल्हा परिषदेला दिलेले नाही आणि जिल्हा परिषदेनेही ते का दिले नाही म्हणून चौकशी करण्याचे धाडस दाखविलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी वाट पाहून याबाबत पुन्हा ४ मार्चला संबंधित अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविले. पुन्हा जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र देऊन पडताळणीची मागणी केली आहे. आता अन्न आणि औषध प्रशासन विभाग नेमकी काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे.

चौकट

ठेकेदारांचा दबाव

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने ठेकेदारांची सर्व देयके थांबवली आहेत. मुळात ही देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही. राज्य आपत्ती प्रतिसाद विभागाकडून जिल्हा परिषदेला सहा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मात्र हा निधी याआधी राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून खर्च केला असल्याने तो निधी अभियानाला अदा करण्यात आला आहे; परंतु काही ठेकेदारांनी ‘हा निधी आम्ही विभागीय आयुक्तांकडून मंजूर करून आणला असून त्यातून आमचे पैसे द्या,’ असा तगादा लावला आहे. यासाठी मंत्र्यांची नावे सांगितली जात आहेत. जोपर्यंत दराची पडताळणी होत नाही तोपर्यंत देयके अदा करू नयेत, अशा जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी सूचना केल्याने ठेकेदारांचा चाप लागला आहेत.