शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

नव्वदीनंतरही ठरले भारी...२३९ वृद्धांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST

कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट २१ ते ५० वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना दुसरीकडे कोल्हापूर ...

कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट २१ ते ५० वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील वयाची नव्वदी पार केलेल्या २३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवले असून, हीच सकारात्मकता इतर रुग्णांनी ठेवण्याची गरज आहे. मूळची प्रकृती खणखणीत, कष्टदायी शरीरयष्टी व आजाराला पळवून लावण्याची हिंमत बाळगल्यानेच ते कोरोनाला हरवू शकले आहेत.

गेल्यावर्षी मार्चपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाला प्रारंभ झाला. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा कहर झाला. विशेषत ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागले आणि मृतांमध्येही ज्येष्ठ नागरिकांनाच धक्का बसला. त्या तुलनेत यावर्षी मात्र तीव्र स्वरूपाच्या या विषाणूमुळे कमी वयाच्या युवकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते.

असे असले तरी वय जास्त असलेल्या नागरिकांनीही कोरोनावर मात केली आहे. पहिल्या लाटेत ११४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर, त्यापैकी १९८ जणांचा मृत्यू झाला. तर ९६ जणांनी कोरोनावर मात केली. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या दहा महिन्यांतील आहे. तर यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत १७० नव्वदीच्यावरील नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह २८४

बरे झाले २३९

पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह ११४

दुसऱ्या लाटेतील पाॅझिटिव्ह १७०

पहिल्या लाटेतील मृत्यू १८

दुसऱ्या लाटेतील मृत्यू २७

२ ५० ते ६० वयोगटातील सर्वाधिक मृत्यू

पहिल्या लाटेवेळी ज्येष्ठ नागरिकांचाच जास्त मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र, दुसऱ्या लाटेवेळी तरुणांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेत ६० ते ७५ वयोगटातील ९६१ तर दुसऱ्या लाटेत गेल्या पाच महिन्यांत ६३२ अशा एकूण १५९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोट

माझी नोकरी मी सायकलवरूनच ये-जा करून पूर्ण केली आहे. मी पॉझिटिव्ह आलो तरी माझे जेवण व्यवस्थित घेत होतो. नोकरीतून निवृत्त झाल्यानंरही मी कधी व्यायाम चुकवला नाही. याचा मला फायदा झाला.

०८०६२०२१ कोल दादासाो पाटील

दादासाेा यशवंत पाटील, वय ९७ रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर

कोट

कोरोना झाला तरी त्यातून बरे होणार असा मला आत्मविश्वास होता. इचलकरंजीच्या सरकारी दवाखान्यात उपचार घेऊन मी बरी झाले. मात्र वयोमानानुसार होणार त्रास सुरू आहे.

०८०६२०२१ कोल हिराबाई नाईक

हिराबाई गणपती नाईक, वय ९६ रा. रुकडी, ता. हातकणंगले