शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

इथेनॉल जनजागृतीसाठी जूनपासून मेळावे घेणार

By admin | Updated: May 15, 2016 00:51 IST

शामराव देसाई : निर्मितीसाठी केंद्र सकारात्मक

कोल्हापूर : इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, आगामी ऊस गळीत हंगामात खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी. यासह इथेनॉलबाबत जनजागृती होण्यासाठी जूनपासून पश्चिम महाराष्ट्रात मेळावे आयोजित केल्याची माहिती जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता देसाई यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. पेट्रोलपेक्षा सरस असलेल्या व पर्यावरणपुरक इथेनॉल निर्मितीस चालना द्यावी, अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेची आहे. याबाबत गेली दहा - पंधरा वर्षे केंद्राच्या पातळीवर प्रयत्न करीत होतो. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर इथेनॉलचे दर २७ रुपयांवरून ४८.५० रुपयांपर्यंत गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी दिल्लीमध्ये मेळावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्याशी चर्चा झाली. केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती व वापराबाबत सकारात्मक असून, गेल्यावर्षी निर्णय घेणार होतो; पण दुष्काळामुळे घेता आला नाही. यावर्षी इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे मंत्री पासवान यांनी सांगितले. साखर अतिरिक्त झाल्याने निर्यात अनुदान देण्याची वेळ केंद्रावर आली. यापेक्षा गरजेपुरती साखर उत्पादन करून उर्वरित उसापासून इथेनॉल केले, तर साखर उद्योगाबरोबर ऊस उत्पादकाच्या जीवनात निश्चितच स्थैर्य येईल, हे केंद्र सरकारला पटवून देण्यात यशस्वी झाल्याचे देसाई म्हणाले. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, आदी सात जिल्ह्णांत १२ ते १३ रिकव्हरीचा जवळपास सात कोटी टन ऊस आहे. पहिल्या टप्यात येथेच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभे करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘गुरुदत्त’कडे क्षमता! रिलायन्स उद्योग समूह महाराष्ट्रात केवळ इथेनॉल तयार करणारे कारखाने उभे करू शकते; पण त्यांच्याबरोबर इतरांनीही प्रयत्न करावेत, गुरुदत्त शुुगर्सकडे तेवढी क्षमता असून, त्यांच्याकडे आपण प्रस्ताव ठेवल्याचे देसाई यांनी सांगितले.