शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
5
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
6
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे ट्रॅव्हल अम्मा?
7
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
8
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
9
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
10
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
11
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
14
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
15
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
16
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
17
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
18
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
19
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
20
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल

पंचगंगा नदी खोरे प्राधिकरण स्थापन करा

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

अ‍ॅड. धैर्यशील सुतार : अन्यथा नदी मृतवत होण्याचा धोका

 कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करायची असेल तर राज्य शासनाने विशेष कायदा करून प्रदूषण मुक्तीच्या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण निधीसहीत पंचगंगा नदी खोरे प्राधिकरणासारखे स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी उच्च न्यायालयात पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी लढा देत असलेले वकील धैर्यशील सुतार यांनी केली. अन्यथा एक दिवस मृतवत झालेली नदी पाहायला मिळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.पत्रकात म्हटले आहे, ‘पंचगंगा नदी प्रदूषणाचे सर्वेक्षण आणि अभ्यास वारंवार होऊनसुद्धा अंमलबजावणीत घोडे अडते व कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचगंगा प्रदूषण रोखण्यास असमर्थ असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.पंचगंगा नदीत वीस वर्षांपासून प्रदूषण वाढत गेले आहे. प्रयाग चिखलीपासून नरसोबावाडीपर्यंत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या काठी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी पालिका तसेच १७४ गावे व ३ औद्योगिक वसाहती, साखर कारखाने आहेत. इचलकरंजी येथील दत्ता माने, सदा मलाबादे व वकील जयंत बलुगडे यांनी २०१२ मध्ये काविळीमुळे २२ बळींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण मुक्तीच्या प्रमुख मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी) या केंद्र सरकार पुरस्कृत संस्थेला पंचगंगा नदी प्रदूषणाची कारणीभूत घटक व त्यावर उपाययोजना सुचविण्याचा अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्याप्रमाणे उच्च न्यायालयात हा अहवाल आला. त्यामध्ये ५२ टक्के या प्रदूषणास कोल्हापूर मनपा व २३ टक्के इचलकरंजी नगरपालिका जबाबदार असल्याचे स्पष्ट केले व उर्वरित इतर घटक कारणीभूत आहेत. वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या संस्थांकडे न देता, राज्य शासनाने एक विशेष कायदा करून वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रदूषणमुक्तीचे अधिकार काढून घ्यावेत व निधीसह अंमलबजावणीचे अधिकार या वैधानिक प्राधिकरणास असावेत. या प्राधिकरणाच्या प्रमुखपदी सचोटीच्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व आवश्यक स्वायत्तता द्यावी. त्यामध्ये पर्यावरण व अभियांत्रिकी तज्ज्ञांची नियुक्ती करावी, असेही पत्रकात म्हटले आहे.