शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पंचगंगा नदी खोरे प्राधिकरण स्थापन करा

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

अ‍ॅड. धैर्यशील सुतार : अन्यथा नदी मृतवत होण्याचा धोका

 कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करायची असेल तर राज्य शासनाने विशेष कायदा करून प्रदूषण मुक्तीच्या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण निधीसहीत पंचगंगा नदी खोरे प्राधिकरणासारखे स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी उच्च न्यायालयात पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी लढा देत असलेले वकील धैर्यशील सुतार यांनी केली. अन्यथा एक दिवस मृतवत झालेली नदी पाहायला मिळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.पत्रकात म्हटले आहे, ‘पंचगंगा नदी प्रदूषणाचे सर्वेक्षण आणि अभ्यास वारंवार होऊनसुद्धा अंमलबजावणीत घोडे अडते व कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचगंगा प्रदूषण रोखण्यास असमर्थ असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.पंचगंगा नदीत वीस वर्षांपासून प्रदूषण वाढत गेले आहे. प्रयाग चिखलीपासून नरसोबावाडीपर्यंत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या काठी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी पालिका तसेच १७४ गावे व ३ औद्योगिक वसाहती, साखर कारखाने आहेत. इचलकरंजी येथील दत्ता माने, सदा मलाबादे व वकील जयंत बलुगडे यांनी २०१२ मध्ये काविळीमुळे २२ बळींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण मुक्तीच्या प्रमुख मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी) या केंद्र सरकार पुरस्कृत संस्थेला पंचगंगा नदी प्रदूषणाची कारणीभूत घटक व त्यावर उपाययोजना सुचविण्याचा अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्याप्रमाणे उच्च न्यायालयात हा अहवाल आला. त्यामध्ये ५२ टक्के या प्रदूषणास कोल्हापूर मनपा व २३ टक्के इचलकरंजी नगरपालिका जबाबदार असल्याचे स्पष्ट केले व उर्वरित इतर घटक कारणीभूत आहेत. वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या संस्थांकडे न देता, राज्य शासनाने एक विशेष कायदा करून वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रदूषणमुक्तीचे अधिकार काढून घ्यावेत व निधीसह अंमलबजावणीचे अधिकार या वैधानिक प्राधिकरणास असावेत. या प्राधिकरणाच्या प्रमुखपदी सचोटीच्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व आवश्यक स्वायत्तता द्यावी. त्यामध्ये पर्यावरण व अभियांत्रिकी तज्ज्ञांची नियुक्ती करावी, असेही पत्रकात म्हटले आहे.