शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी शेतकरी संस्थांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतीमालाचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारच्या वतीने शेतकरी उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतीमालाचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारच्या वतीने शेतकरी उत्पादक सहकारी संस्थांची स्थापना केली जाणार आहे. या संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना व अनुदानाचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.

लहान शेतकऱ्यांना विविध साधनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, त्याचबरोबर कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने कृषी क्षेत्राचे नूतनीकरण केले आहे. जुलै २०२० मध्ये शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना करून त्यासाठी एक योजना सुरू केली. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे व सामुदायिक शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी या योजनेचा फायदा होईल, असे सरकारचे मत आहे. यासाठी राज्यात शेतकरी उत्पादक सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचे आदेश सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. केंद्र सरकार सहकारी संस्थांना नाबार्ड व एनसीडीसीच्या माध्यमातून अर्थपुरवठा करते. त्याच धर्तीवर या संस्थांनाही अर्थपुरवठा करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे.

...अशी होणार संस्थेची नोंदणी

संस्थेचे कार्यक्षेत्र तालुक्यापुरते मर्यादित राहील.

नाेंदणीवेळी किमान ५० प्राथमिक सभासद.

सभासदांमध्ये अल्पभूधारक, महिला, भूमिहीन, भाडेकरू, अनूसूचित जाती, जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील शेतकरी हवेत.

नोंदणी वेळी किमान एक लाख रुपये भागभांडवल हवे.

सभासद भागाची किंमत दोन हजार रुपये राहील.

कोट-

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थांची नोंदणी होत आहे. संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक शेतीला प्रोत्साहन मिळणार असून, शेतीमालाच्या विक्रीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

-अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)