शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

Kolhapur- 'पुनर्वसन' कार्यालयात प्रवेशाचा लष्करी फतवा, अधिकाऱ्यांना भेटण्यासाठीच फक्त दोनच तास 

By भीमगोंड देसाई | Updated: July 7, 2023 16:51 IST

कार्यालयात थेट लोकांनी जाऊ नये, यासाठी टेबल आडवे लावून वाट अडवली

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील जिल्हा पुनर्वसन कार्यालयात लोकांना प्रवेशबंदी केली आहे. पुनर्वसनच्या नूतन उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांनी हा फतवा काढला आहे. सकाळी ११ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत मलाच भेटायचे, कार्यालयात जायचे नाही, असा त्यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कार्यालयात थेट लोकांनी जाऊ नये, यासाठी टेबल आडवे लावून वाट अडवली आहे.पुनर्वसन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असतो. येथील काम पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. परिणामी या कार्यालयाचे कामकाज वादग्रस्त ठरले आहे. दरम्यान, येथे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी म्हणून महिन्यापूर्वी लष्करे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांनी आठ दिवसांपूर्वी कार्यालयात सरसकट सर्वांनी येण्यास मज्जाव केला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी कार्यालयात प्रवेशद्वारातच दोन टेबले आडवी लावून तिथे एका लिपिकाला बसवले आहे.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब, सर्वसामान्य, शेतकरी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामाच्या चौकशीसाठी कार्यालयात येत आहेत. मात्र त्यांना प्रवेशद्वारातच लिपिक रोखतो. तो लिपिक मॅडमना भेटा, अशी सूचना देतो. मॅडम कधी भेटणार अशी विचारणा केल्यावर सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास असे सांगण्यात येते. आम्हाला त्या वेळेत बसने येणे आणि जाणे शक्य नाही, असे लोक सांगतात; तरीही लिपिक प्रवेश देत नाही. नाराज होऊन लोक मॅडमच्या भेटीची प्रतीक्षा करीत बाकड्यावर बसून राहतात. काही लोक लिपिकाशी भांडण काढत आहेत. वादावादी करीत आहेत. जनतेसाठी असलेल्या कार्यालयात अशा प्रकारे प्रवेशबंदी करून मुस्कटदाबी केल्याने संताप व्यक्त होत आहे.

वेळ गैरसोयीचीआजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, आदी कोल्हापूरपासून लांब तालुक्यांतील गावातून बसने पुनर्वसन कार्यालयात येण्यास दुपारी एक किंवा दोन वाजतात. यामुळे ते पुनर्वसन अधिकाऱ्यांना सकाळी ११ ते १२ या वेळेत भेटू शकत नाहीत. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भेटल्यास गावी जाण्यास रात्र होते. काही मार्गांवर बसेसही मिळत नाहीत; यामुळे सकाळी आणि संध्याकाळची ही अभ्यागत भेटीची वेळ गैरसोयीची आणि त्रासदायक ठरत आहे.

विसंगत कारण

टेबल लावून कार्यालयातील रस्ता अडवलेला लिपिक ‘न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे. त्यामुळे कार्यालयात जाता येणार नाही,’ असे सांगतो. अधिकारी मात्र कार्यालयात गर्दी होते; यामुळे निश्चित केलेल्या वेळी मलाच भेटायचे असे सांगत आहेत. कार्यालयातील प्रवेशबंदीच्या कारणामध्येही विसंगती असल्याचे जाणवते.

जिल्हाधिकाऱ्यांचे दार उघडे, पुनर्वसनचे बंदजिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कधीही भेटता येते. यांच्या कक्षाचा दरवाजा नेहमी उडा असतो. याउलट पुनर्वसन कार्यालयातील प्रवेशच बंद केल्याने तलावासाठी घर, शेत दिलेल्यांची एकप्रकारे हेटाळणीच सुरू असल्याचाही आरोप होत आहे.

हेलपाटे यासाठी...

धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करणे, पुनर्वसनाचा दाखला देणे, पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीविषयक प्रमाणपत्र देणे, धरणग्रस्तांसाठी कल्याणकारी योजना राबविणे, भूसंपादन प्रस्तावांना अभिप्राय देणे.

लोक कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना भेटल्याने गर्दी होते. त्यातून कामात अडथळा येतो. त्यामुळे मला सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास भेटावे. इतर वेळी लोकांना भेटण्यास बंदी केली आहे. काम गतीने व्हावे यासाठीच तसे केले आहे. - सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, कोल्हापूर

पुनर्वसनाचा दाखल्यासाठी तीन वेळा आलो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या त्रुटी काढल्या आहेत. आज आलो आहे. पण मला कार्यालयात प्रवेश नाकारला आहे. - प्रकल्पग्रस्त, करंबळी, ता. गडहिंग्लज. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार