शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

मातीशी नाते जपणारा उद्योजक : अण्णासाहेब चकोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

सन १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ३० वर्षाचा वटवृक्ष असून पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नवे छोटेसे रोपटे लावले आहे. ...

सन १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ३० वर्षाचा वटवृक्ष असून पुन्हा कॉर्पोरेट क्षेत्रात नवे छोटेसे रोपटे लावले आहे. अण्णासाहेब यांनी कामाचे नियोजन, व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील बारकावे, मार्केटिंगची कलासुद्धा अगदी सहजपणे पार पाडली आहे. युरोपियन राष्ट्रे , जर्मन, चीन, मलेशिया, सिंगापूर, दुबई, आदी ठिकाणी सातासमुद्रापार जाऊन त्यांनी बेकरी उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली आहे. १५० नव्या उद्योजकांना त्यांनी या आउटलेटच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याचे कंपनीबरोबर एक नातं असलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. दिवसभराच्या कामात ते कधी कंटाळत नाहीत; पण रात्री ते वाचन, अध्यात्माचे श्रवण करतात. बेकरी उद्योगातील अल्पावधीत कारकिर्द लक्षात घेऊन भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योगने नवी दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चासत्रासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योगमंत्री सुबोधकांत सहाय यांच्या हस्ते उद्योग विभूषण अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिला जाणारा यशस्वी उद्योग पुरस्कारही प्रदान करण्यात आला. सध्या ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून देशभरातील बेकरी उद्योगांसाठी योगदान देत आहेत. यशस्वी उद्योजक बनल्यानंतरही समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न त्यांनी सामाजिक कार्यातून केला आहे. कामगारांप्रती आत्मीयता, सामाजिक कार्यासाठी सुरू असणारी धडपड पाहिल्यास एक परिपूर्ण उद्योगपती म्हणून चकोते यांचा उल्लेख होतो. त्यांच्या विशाल उत्तुंग याचाही पायाभरणीच केली आहे. त्यांच्या या उद्योगाच्या भरारीसाठी व समाजाच्या उन्नतीसाठी कारण ठरलेल्या अण्णासाहेबांना दीर्घायुष्य लाभो...!

(प्रतिनिधी)

फोटो - २३०३२०२१-जेएवाय-०४-अण्णासाहेब चकोते