शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक स्थलांतरच्या निर्णयावर उद्योजक ठाम

By admin | Updated: November 5, 2014 00:23 IST

‘गोशिमा’कडून पाठपुरावा : वीज दरवाढीबाबत नाराजी कायम

कोल्हापूर : केंद्रात स्पष्ट बहुमत असलेले भाजप सरकार, त्यानंतर उद्योगवाढीला चालना देणारा जाहीर झालेला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आणि आता राज्यातही भाजपची सत्ता असूनही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांनी वीज दरवाढीच्या मुद्द्यावर कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयात कोणताही बदल केलेला नाही.पायाभूत सुविधांची कमतरता, वाढलेले वीज दर, पाणी बिलातील वाढ, आदी कारणांमुळे वैतागलेल्या उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यात कोल्हापूरच्या उद्योजकांनी पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने गेल्या सात महिन्यांपासून कार्यवाही सुरू केली. उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी निवेदन देऊन, प्रत्यक्षात चर्चा, आंदोलन करूनदेखील उद्योजकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यानंतर ‘गोशिमा’ने ज्या उद्योजकांना कर्नाटकात जमीन हवी आहे, त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले. त्यानुसार सुमारे पावणेदोन हजार अर्जांची विक्री झाली असून, त्यापैकी दीड हजारांहून अधिक उद्योजक कर्नाटकमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. त्यांनी एकत्रितपणे सुमारे १ हजार ४०० एकर जागेची मागणी केली आहे. केंद्रात बहुमत असलेले सरकार तसेच या सरकारकडून उद्योगवाढीला चालना देणारा जाहीर झालेला अर्थसंकल्प आणि आता व्यावसायिक, उद्योजकांना अपेक्षित राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हे नाराज उद्योजक कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रात आणि राज्यात नवे सरकार आले असले तरी या सरकारला मागील सरकारने बिघडविलेली परिस्थिती सुधारण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे मत कर्नाटक स्थलांतरावर ठाम असलेल्या उद्योजकांनी व्यक्त केले आहे. सरकार जरी बदलले तरी कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयात त्यांनी बदल केलेला नाही. आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘गोशिमा’च्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्टमंडळाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली मागणी मांडली. त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, याबाबत ‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे म्हणाले, कर्नाटक स्थलांतरणावर आम्ही ठाम आहोत. शिवाय त्याबाबत कर्नाटक सरकारशी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)विमानसेवेच्या प्रयत्नांना गती देणारपर्यावरण, सुरक्षा, आदी स्वरूपांतील आवश्यक ते ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळाले आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) चाचणीअभावी कोल्हापूरची विमानसेवा प्रारंभ लांबणीवर पडत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या धावपळीने मला विमानसेवेच्या मुद्द्यांकडे फारसे लक्ष देता आले नाही. येत्या चार दिवसांत दिल्लीत जाऊन ‘डीजीसीए’च्या चाचणीबाबत चर्चा करणार आहे. विमानसेवा प्रारंभ करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्यादृष्टीने मी कार्यवाही करेन, असे महाडिक यांनी सांगितले.