शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पूर्व दरवाज्यातून प्रवेश, दक्षिणमधून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले अंबाबाई मंदिराचे दरवाजे घटस्थापनेपासून उघडण्यात येणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे यावर ...

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले अंबाबाई मंदिराचे दरवाजे घटस्थापनेपासून उघडण्यात येणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे यावर देवस्थान समितीचे नियोजन सुरू आहे. महाद्वार बंदच ठेवून पूर्व दरवाज्यातून भाविकांना प्रवेश व दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडायचे आणि घाटी दरवाजा वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवणार आहे. परस्थ भाविकांसाठी ऑनलाइन बुकिंगची सोय सुरू करण्यात येणार आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दिवाळीत अंबाबाईसह सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली झाली, पाच महिन्यांनंतर दुसरी लाट आल्याने पून्हा एप्रिलमध्ये दरवाजे बंद झाले. पण शुक्रवारी रात्री राज्य शासनाने घटस्थापनेपासून सर्व मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिराची दारे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने देवस्थान समितीपुढे सोशल डिस्टन्सिंग राखून गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान आहे. ते कसे पार पाडायचे याचा विचार सुरू झाला आहे. महाद्वारमधून सर्वात जास्त गर्दी हाेते, त्यामुळे हा दरवाजा बंदच ठेवायचा. पूर्व दरवाज्यातून गाभारा दर्शनाची रांग जाते. येथून भाविकांना प्रवेश आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडायचे, आणि घाटी दरवाजा वयोवृद्ध दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवायचा असा विचार सध्या सुरू आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर समितीने दर्शनाची कशी व्यवस्था केली याची माहितीदेखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मागविली आहे. या दोन्ही पर्यायांचा विचार करून गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची वेळ बघून बैठक घेण्यात येणार आहे.

अंबाबाईचा नवरात्रोत्सव आणि दसरा साेहळा जगप्रसिद्ध आहे. याकाळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या २५ लाखांवर असते. पहिल्या दिवशी पहाटेपासून येथे भाविकांच्या रांगा लागतात. सुट्टीचा दिवस आणि अष्टमीला तर तोबा गर्दी असते. परस्थ भाविकांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या नियोजनासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यांना दर्शनासाठी ठरावीक वेळ दिली जाईल. ही रांग स्वतंत्र असेल. हे सगळे नियोजन असले तरी त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

-----

मुखदर्शनाची सोय काय..

महाद्वारातून देवीचे मुखदर्शन घेणारा मोठा भाविक वर्ग आहे. येथून गरुड मंडपापर्यंत मुखदर्शन रांग सोडली जाते. त्यामुळे हा दरवाजाच बंद ठेवल्यास मुख दर्शनाची सोय कशी करणार हे कोडेच आहे. मुखदर्शन बंद झाल्यावर परत हा ताण मुख्य दर्शन रांगेवर वाढणार आहे.