शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

युतीच्या धोरणाने साखर कारखानदारी उद्ध्वस्त

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

हसन मुश्रीफ : राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित कार्यकर्ता बैठक

कोल्हापूर : साखरेच्या दराबाबत ठोस धोरण नाही, साखर कारखान्यांना मदतीसाठी नुसते झुलवत ठेवायचे आणि दुसरीकडे एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्यांवर कारवाई करायचे धोरण, राज्यातील युती व केंद्रातील भाजप सरकारचे आहे. त्यामुळे संपूर्ण सहकारी साखर कारखानदारी उद्ध्वस्त होणार असल्याची टीका राज्याचे माजी जलसंपदामंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी आज, बुधवारी केली. पुणे येथे ७ व ८ फेबु्रवारीला होणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. राज्य व केंद्रातील सरकार सर्व बाजूंनी निष्फळ ठरले आहे. त्याविरोधात जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन करत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकरी, कामगार यांच्या विरोधात काम सुरू केले आहे. याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून युती सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश करण्याची तयारी ठेवा. साखर कारखानदारीबाबत सरकारचे धोरण एकदम चुकीचे आहे. सहकार मोडीत निघाला, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, याचे भान सरकारला नाही. केवळ उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा सपाटा केंद्र व राज्य सरकारने लावला असून, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी महात्मा गांधी यांचे विचार व शांतीचा संदेश संपूर्ण जगाला आदर्श असल्याचे सांगितले, पण ज्यांनी गांधीजींचा खून केला त्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण भाजप सरकार करत आहे, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून सरकारला घेरा, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले. पुणे येथील मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, आगामी काळात केंद्र सरकारच्या सामान्य माणसांच्या विरोधातील धोरणांबाबत आपली भूमिका मांडावी लागणार असल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्थायी सभापती आदिल फरास यांनी आभार मानले. महापौर तृप्ती माळवी, माजी आमदार नामदेवराव भोईटे, माजी महापौर कादंबरी कवाळे, गटनेता राजू लाटकर, मधुकर जांभळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविकात पुणे येथील मेळावा, त्यासाठीच्या नियोजनाचा आढावा घेतला.