शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

‘दक्षिण’ला उत्साह, मतदारांच्या रांगाच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:08 IST

कोल्हापूर : दिवसभर रणरणते ऊन असतानाही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदान करण्यासाठी मतदारांत अमाप उत्साह दिसून आला. शहराच्या उपनगरांत आणि ...

कोल्हापूर : दिवसभर रणरणते ऊन असतानाही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदान करण्यासाठी मतदारांत अमाप उत्साह दिसून आला. शहराच्या उपनगरांत आणि गावामध्ये मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र होते. तपोवन, उचगाव, फुलेवाडी, आदी काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येण्याचे प्रकार घडले; पण सर्वत्र मतदान सुरळीत व शांततेत झाले. कार्यकर्त्यांत मात्र ‘आमच ठरलंय’- ‘ध्यानात ठेवलंय’ची शेरेबाजी प्रत्येक केंद्रावर सुरू होती.प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारले होते. पाळणाघर, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी व्हीलचेअर, प्रथमोपचारासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रारंभी काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरू करण्यास उशीर झाला; तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे मशीन वेळेत सुरू न झाल्याने गोंधळ उडाला; पण काही वेळातच नवीन मशीन आणून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरामध्ये कोणतेही खासगी वाहन आणण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला होता. त्यावरून अनेक ठिकाणी पोलीस, कार्यकर्ते यांच्यात किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.फुलेवाडी, जवाहरनगर, सुभाषनगर, बाबा जरगनगर, कळंबा, पाचगाव, गिरगाव, कंदलगाव, मोरेवाडी, उचगाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी या भागांत मतदान केंद्रावर रांगा दिसत होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांवर ५० टक्के मतदान झाले होते. गिरगाव, कंदलगाव, मोरेवाडीत शेतकरी मतदारांनी शेतातील कामे आटोपती घेऊन दुपारनंतर मतदान केले.केंद्रप्रमुखाच्या मोबाईलवर डल्लापालकमंत्री चंद्र्रकांत पाटील हे आई, पत्नी व सासूसह सकाळी अकरा वाजता शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल केंद्रावर मतदानासाठी आले. ते मतदान करीत असताना खोलीमध्ये गर्दी झाली. त्याचा फायदा उठवीत अज्ञाताने टेबलावर ठेवलेला केंद्रप्रमुखांचा मोबाईल काही क्षणांतच गायब केला.दोन तास रांगेतउचगाव येथे कन्या व कुमार विद्यामंदिर या केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा शाळेबाहेर मैदानात आल्या होत्या. मतदान केंद्रातील दोन खोल्यांत ज्येष्ठ नागरिकांकडून ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्यानंतर ते अडकून बसत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू राहिली. मतदार रांगेत उभारल्यानंतर ते सुमारे दोन तासांनी मतदान करून बाहेर येत होते.