शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:26 IST

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देनिर्णय गुरुवारपूर्वी घेणे आवश्यकबारावीची फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची मागणीठोस निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने बारावी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्या अथवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा योजनेअंतर्गत फेरपरीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,असा या परीक्षा घेण्यामागील उद्देश आहे. यावर्षी बारावीची मुख्य परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली असून, निकाल दि. ३१ मे रोजी लागला. यानंतर दि. ११ ते २८ जुलैला फेरपरीक्षा झाली. राज्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या स्वरूपातील फेरपरीक्षांचे इतर राज्यांतील निकाल जाहीर झाले आहेत.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी शाखेतील अंतिम प्रवेशाची मुदत गुरुवारपर्यंत आहे. त्यामुळे फेरपरीक्षार्थींचा निकाल या मुदतीपूर्वी जाहीर होणे आवश्यक आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल दि. १० आॅगस्टपूर्वी लागणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त होऊनदेखील अभियांत्रिकी प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या अभियांत्रिकी प्रवेशाची मुदत अंतिम तीन आठवड्यांनी वाढवावी, अथवा दि. १० आॅगस्टपूर्वी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

अभियांत्रिकी शाखेतील अनेक प्रवेश जागा दरवर्षी रिक्त राहतात. याची दखल घेऊन फेरपरीक्षेचा निकाल लावणे अथवा प्रवेशाची मुदत वाढवावी, या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दि. २८ जुलैला निवेदन दिले आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यादृष्टीने मंत्री तावडे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.