शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:26 IST

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देनिर्णय गुरुवारपूर्वी घेणे आवश्यकबारावीची फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची मागणीठोस निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने बारावी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्या अथवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा योजनेअंतर्गत फेरपरीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,असा या परीक्षा घेण्यामागील उद्देश आहे. यावर्षी बारावीची मुख्य परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली असून, निकाल दि. ३१ मे रोजी लागला. यानंतर दि. ११ ते २८ जुलैला फेरपरीक्षा झाली. राज्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या स्वरूपातील फेरपरीक्षांचे इतर राज्यांतील निकाल जाहीर झाले आहेत.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी शाखेतील अंतिम प्रवेशाची मुदत गुरुवारपर्यंत आहे. त्यामुळे फेरपरीक्षार्थींचा निकाल या मुदतीपूर्वी जाहीर होणे आवश्यक आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल दि. १० आॅगस्टपूर्वी लागणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त होऊनदेखील अभियांत्रिकी प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या अभियांत्रिकी प्रवेशाची मुदत अंतिम तीन आठवड्यांनी वाढवावी, अथवा दि. १० आॅगस्टपूर्वी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

अभियांत्रिकी शाखेतील अनेक प्रवेश जागा दरवर्षी रिक्त राहतात. याची दखल घेऊन फेरपरीक्षेचा निकाल लावणे अथवा प्रवेशाची मुदत वाढवावी, या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दि. २८ जुलैला निवेदन दिले आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यादृष्टीने मंत्री तावडे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.