शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:26 IST

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देनिर्णय गुरुवारपूर्वी घेणे आवश्यकबारावीची फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची मागणीठोस निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने बारावी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्या अथवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा योजनेअंतर्गत फेरपरीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,असा या परीक्षा घेण्यामागील उद्देश आहे. यावर्षी बारावीची मुख्य परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली असून, निकाल दि. ३१ मे रोजी लागला. यानंतर दि. ११ ते २८ जुलैला फेरपरीक्षा झाली. राज्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या स्वरूपातील फेरपरीक्षांचे इतर राज्यांतील निकाल जाहीर झाले आहेत.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी शाखेतील अंतिम प्रवेशाची मुदत गुरुवारपर्यंत आहे. त्यामुळे फेरपरीक्षार्थींचा निकाल या मुदतीपूर्वी जाहीर होणे आवश्यक आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल दि. १० आॅगस्टपूर्वी लागणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त होऊनदेखील अभियांत्रिकी प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या अभियांत्रिकी प्रवेशाची मुदत अंतिम तीन आठवड्यांनी वाढवावी, अथवा दि. १० आॅगस्टपूर्वी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

अभियांत्रिकी शाखेतील अनेक प्रवेश जागा दरवर्षी रिक्त राहतात. याची दखल घेऊन फेरपरीक्षेचा निकाल लावणे अथवा प्रवेशाची मुदत वाढवावी, या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दि. २८ जुलैला निवेदन दिले आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यादृष्टीने मंत्री तावडे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.