शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:26 IST

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देनिर्णय गुरुवारपूर्वी घेणे आवश्यकबारावीची फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची मागणीठोस निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

 कोल्हापूर : बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशाची (संस्था पातळीवरील व्यवस्थापन कोटा) अंतिम मुदत गुरुवारी (दि. १० आॅगस्ट) आहे. मात्र, बारावी विज्ञान शाखेच्या फेरपरीक्षेचा निकाल लवकर लागणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. विद्यार्थीहितास्तव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत तीन आठवड्यांनी वाढवावी, अशी मागणी फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने बारावी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्या अथवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा योजनेअंतर्गत फेरपरीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,असा या परीक्षा घेण्यामागील उद्देश आहे. यावर्षी बारावीची मुख्य परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली असून, निकाल दि. ३१ मे रोजी लागला. यानंतर दि. ११ ते २८ जुलैला फेरपरीक्षा झाली. राज्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या स्वरूपातील फेरपरीक्षांचे इतर राज्यांतील निकाल जाहीर झाले आहेत.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी शाखेतील अंतिम प्रवेशाची मुदत गुरुवारपर्यंत आहे. त्यामुळे फेरपरीक्षार्थींचा निकाल या मुदतीपूर्वी जाहीर होणे आवश्यक आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल दि. १० आॅगस्टपूर्वी लागणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त होऊनदेखील अभियांत्रिकी प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या अभियांत्रिकी प्रवेशाची मुदत अंतिम तीन आठवड्यांनी वाढवावी, अथवा दि. १० आॅगस्टपूर्वी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी पत्रकाद्वारे केली आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन

अभियांत्रिकी शाखेतील अनेक प्रवेश जागा दरवर्षी रिक्त राहतात. याची दखल घेऊन फेरपरीक्षेचा निकाल लावणे अथवा प्रवेशाची मुदत वाढवावी, या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दि. २८ जुलैला निवेदन दिले आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यादृष्टीने मंत्री तावडे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.