शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ऊर्जाबचत करणारे ‘फॅन’ही बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:39 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे.गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशभरात सुमारे २७ कोटी ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे.गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशभरात सुमारे २७ कोटी ७९ लाख एलईडी बल्बची विक्री झाली आहे, तर महाराष्टÑात २ कोटी १५ लाख ६० हजार एलईडी बल्बची विक्री झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत एकूण २५ लाख ८८ हजार बल्बची विक्री करण्यात आली आहे. विजेची बचत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ईईएसएल (इलेक्ट्रीक इफेक्ट सर्व्हिस लिमिटेड) या कंपनीच्या अंतर्गत ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम विजेची उपकरणे बाजारात आणली आहेत.पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्ब बाजारात आणले, कमी वॅटमध्ये जादा परिसर प्रकाशमय होत असल्याने त्याला ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता सरकारने एलईडी ट्यूब लाईट आणि फॅन बाजारात आणले आहेत. नामांकित कंपन्यांकडून ही उपकरणे निर्मिती करून सरकार ती आपल्या माध्यमातून आणत आहे. शहरासह मोठ-मोठ्या गावांत ‘महावितरण’च्या केंद्रांवर ही उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.आता पूर्वीच्या ७ वॅटऐवजी आता ९ वॅटचे बल्ब बाजारात आणले आहेत. त्याशिवाय पूर्वीच्या पारंपरिक ट्यूबला ४० वॅट वीज खर्चिक पडत होती. ती आता एलईडी ट्यूबला २० वॅट खर्च होते तर फॅनला लागणाºया ८० वॅटऐवजी एलईडी फॅनला ४८ वॅट वीज खर्च होणार आहे. यामुळे वीज बचतीला वाव मिळत आहे. ही उपकरणे सर्व जिल्ह्यात उपलब्ध झाली असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यांत विक्री केंद्रे कार्यरत आहेत.प्रारंभीच्या काळात ७ वॅट बल्बची किंमत १०० रुपये होती; पण आता नव्याने आलेले एलईडी बल्ब ९ वॅटचे असून ३ वर्षे गॅरंटीसह त्याची किंमत अवघी ७० रुपये ठेवली आहे. शासनाच्या एलईडी बल्बच्या ‘उजाला’ योजनेमुळे गेल्या दीड वर्षात देशभरात स्वत:चे जाळे निर्माण केले असून सुमारे २७ कोटी ७९ लाख ७५ हजार ४११ एलईडी बल्बची विक्री केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात वर्षाकाठी सुमारे ३६१०० दशलक्ष युनिट विजेची बचत होत आहे.होणारी बचतकमी वॅटवर जादा प्रकाश देत असल्याने त्यामुळे विजेची बचत होत आहे.वीज निर्मितीसाठी दगडी कोळशावर होणारा १४४४० कोटींचा खर्च वाचला.संपूर्ण देशभरातील ७२२७ मेगावॅटची मागणी कमी झाली आहे.सुमारे ३ कोटी टन कार्बन डायर्नडाय आॅक्साईड वायूंचे उत्सर्जन टळल्याने पर्यावरणाला हातभार लागला आहे.