शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आंदोलनात भाग न घेतलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना सरकारकडून प्रोत्साहन पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:21 IST

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : आंदोलनात भाग न घेता ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवलेले आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभिंनदन पत्र देण्यात आलेले आहे.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे दिनांक ११ सप्टेंबर २0१७ पासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन सुरु आहे, ...

ठळक मुद्देबालक, महिलांना लाभ मिळण्यासाठीच अभिनंदन पत्र देण्याची कार्यवाही : शेखर सिंहकर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरुत्वरीत केंद्रामध्ये उपस्थित राहून कामकाज नियमित सुरु करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. १९ : आंदोलनात भाग न घेता ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवलेले आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अभिंनदन पत्र देण्यात आलेले आहे.

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे दिनांक ११ सप्टेंबर २0१७ पासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन सुरु आहे, या आंदोलनात ज्या अंगणवाडी कर्मचाºयांनी भाग न घेता अंगणवाडी कामकाज सुरळीत व नियमित सुरु ठेवले, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दिनांक १४ सप्टेंबर २0१७ रोजी अभिंनदन पत्र देण्यात आले.

यामध्ये या बालके व महिला योजनेच्या लाभांपासून वंचित राहून त्यांना या संपाची झळ पोहोचू नये या उदात्त हेतूनेच ही अभिनंदनपर पत्र दिल्याचा उल्लेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी या पत्रात केला आहे.

शासन निर्देशानुसार अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन कार्यवाही सुरु आहे, असे असुनही अंगणवाडी कर्मचाºयांनी संप सुरुच ठेवलेला आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व महिला व बाल विकास विभागांतर्गत ६ वर्षे वयोगटातील मुलांना पोषण आहारांतर्गत गरम ताजा आहार व सेवांवर परीणाम होऊन बालके सदर सेवांपासून वंचित राहत आहेत.अंगणवाडीतील बालके पूरक पोषण आहार, आरोग्य सेवा या सारख्या अतिमहत्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत या दृष्टीने संप कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्प कुडाळ मधील ७ व प्रकल्प कणकवली मधील २ अंगणवाडी केंद्र संबंधित अंगणवाडी सेविका / मदतनीस यांनी नियमित सुरु ठेवून या योजनेचे लाभ मुलांना देवून चांगले काम केलेले आहे. ६ वर्षे वयोगटापर्यंतची लहान बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार तसेच आरोग्य विषयक सेवा नियमित देणे त्यांचे पोषणवृध्दीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाळा ऋतुचा विचार करता या सेवा सदर लाभार्थींना नियमित देणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे सुध्दा आहे.

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याने संपात सहभागी अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाडी लाभार्थींच्या सेवांचा विचार करुन त्वरीत अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित राहून अंगणवाडीचे कामकाज सुरळीत व नियमित सुरु करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केलेले आहे.