शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम नाट्यानुभवाचा प्रवास : ‘तर्पण’

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

निर्मिती अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली.

महाराष्ट्रातील ज्या गावांनी मराठी रंगभूमीवर मनापासून प्रेम जपलंय अशा गावांपैकी एक गाव म्हणजे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कणकवली. साहजिकच स्पर्धेतील कणकवलीच्या संघाचा नाट्यप्रयोग पाहण्याविषयी जाणकारांच्या मनात विशेष उत्सुकता होती. ‘तर्पण’ हे नाटक सादर करणाऱ्या ‘अक्षरसिंंधू साहित्य कलामंच’ संघाने एक सकस नाट्यानुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत यावर्षीचा स्पर्धेचा दर्जा काय असणार आहे, याची जाणीव इतर स्पर्धक संघांना करून दिली. १९७५ सालाच्या आसपास ‘घटश्राद्ध’ नावाचा एक कानडी सिनेमा आला होता. गिरीश कासारवी दिग्दर्शित या सिनेमाची मूळ कथा ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांची होती. एका पारंपरिक वैदिक पाठशाळा गुरूकुल पद्धतीने चालवणाऱ्या पंडिताच्या मुलीचा पाय नैतिकदृष्ट्या घसरतो आणि संपूर्ण गावासाठी आदराचं स्थान असलेल्या त्या पंडिताच्या वाट्याला बहिष्कृतता येते. त्यातूनच पुढे जिवंतपणी मृत्यूनंतरचे विधी करण्यासारखे पाऊलही त्यांना आपल्या मुलीच्या बाबतीत उचलावे लागते. अशा आशयाची कथा ‘घटश्राद्ध’ मधून अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आली होती. या सिनेमाचा प्रभाव धनंजय सरदेशपांडे लिखित ‘तर्पण’ या नाटकावर ठळकपणे जाणवतो. ‘घटश्राद्ध’ हा कन्नड सिनेमा आणि अंत्यविधीवर गुजराण करणाऱ्या बाह्मण समाजाचे जीवनव्यवहार यांची सांगड घालत सरदेशपांडे यांनी ‘तर्पण’ची संहिता लिहिलेली आहे. नाटकातील बहुतेक सर्व प्रसंग हे एकतर जिथे मृतांसाठीची क्रियाकर्मे केली जातात तो घाट, नारायण गुरूचे घर आणि नारायणच्याच घरातील वरच्या मजल्यावर क्रियाकर्मासाठी येणाऱ्या यजमानांसाठीची खोली यामध्ये घडतात. यासाठी आवश्यक नेपथ्य करताना संजय राणे यांनी रंगमंचाच्या डाव्या बाजूला इंग्रजी एल आकाराची रचना करून नारायण गुरुच्या घराच्या ओसरीचा आभास देण्यात यश मिळवले, तर उजव्या बाजूला असलेल्या थोड्याशा उंच प्लॅटफॉर्मला आवश्यक त्या दृश्यांवेळी एक चौकट लावून वरच्या मजल्यावरील खोलीचे रूप देण्यात येत होते. ज्यावेळी घाटावरची दृश्ये सादर करायची त्यावेळी प्लॅटफॉर्मवरच्या लाकडी चौकटी हलवून मागे घाटाचा आभास निर्माण करणारा पडदा वापरण्यात येत होता. नाटकाचे दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार सुहास वरूणकर यांनी सर्व कलाकारांकडून कसून मेहनत करून घेतली आहे. नाटक सुरू होतं तेव्हा नारायण गुरूचा एकूण त्या गावातील क्रियाकर्म विधीबाबतच्या अधिकारातील वरचष्मा जाणवणे आवश्यक होते. कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेटणाऱ्या अशा ब्राह्मणाची व्यक्तीरेखा उभी करण्यात वरूणकर तसूभरही कमी पडले नाहीत. दुसऱ्या अंकात आपल्या मुलीचा म्हणजे राधाचा पाय घसरल्याने आणि ती गरोदर राहिल्याने घायाळ झालेला व समाजाने बहिष्कृत केलेला बाप वरूणकरांना साकारावा लागला. नाटकाच्या क्लायमॅक्समध्ये राधाला फसवणारा दिगंबर गुमास्ते आपल्या पत्नीचे क्रियाकर्म करण्यासाठी म्हणून पुन्हा गावात येतो तेव्हा त्यानं केलेल्या प्रतारणेचा सूड म्हणून दिगंबरला जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागाव्यात यासाठी राधा आपल्या वडिलांकरवी व मुलाच्या हातून दिगंबरचा क्रियाकर्मविधी घडवते. या प्रसंगी आपल्या मुलीच्या या निर्णयाला साथ देण्यापर्यंतचा अभिनयाचा प्रवास सादर करणे हेही एक आव्हानच होते. नारायण गुरुच्या आईची भूमिका सौ. सुप्रिया प्रभुमिराशी यांनी अनेक बारकाव्यांसह व्यावसायिक कलाकाराच्या ताकदीनं रंगवली. राधाच्या भूमिकेत सौ. प्रणाली चव्हाण यांनी आपल्या परीनं रंग भरला. विठ्ठल गुरूची भूमिका शेखर गवस यांनी ठाकठीक केली. एकूण काय तर चांगला अभिनय त्याला पूरक तांत्रिक बाजू आणि ‘घटश्राद्ध’ वरून प्रेरित का असेना, पण चांगले काहीतरी पाहिल्याचा अनुभव देऊ शकेल, अशी संहिता यांचा योग्य मिलाफ झाला तर नाट्यानुभव कोणत्या पातळीवर नेऊन ठेवता येऊ शकतो, याचे दर्शन ‘तर्पण’ने घडवले.‘तर्पण’ - निर्मिती अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली.नाटककार - धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक सुहास वरूणकर, नेपथ्य संजय राणे, प्रकाशयोजना किशोर कदम, दादा कोरडे, पार्श्वसंगीत संतोष कदम, अमर पवार, रंगभूषा,वेशभूषा दुर्गेश वरूणकर, समीर प्रभुमिराशीपात्रपरिचय - नारायण गुरू सुहास वरूणकर, विठ्ठल गुरू शेखर गवस, शास्त्री शंकर सावंत, आजी सौ. सुप्रिया प्रभुमिराशी, राधा सौ. प्रणाली चव्हाण, दिगंबर विवेकानंद वाळके, मारूती प्रमोद तांबे, केशव उन्मेश कोरडे, गणेश निखिल घोलप, इतर विरेश एकावडे, सचिन कदम.आजचे नाटक‘प्रियंका आणि दोन चोर’ - नाटककार श्याम मनोहर, दिग्दर्शक रोहित पाटीलसंस्था - गायन समाज देवल क्लबकणकवली येथील ‘अक्षरसिंधू साहित्य कलामंच’ने सादर केलेल्या ‘तर्पण’ या नाटकातील दोन दृश्ये.