शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

गिरणी कामगारांना दादांची हुलकावणी!

By admin | Updated: March 27, 2016 01:04 IST

निवासस्थानावरील मोर्चा रद्द : चंद्रकांतदादा पाटील सलग तिसऱ्यांदा अनुपस्थित

कोल्हापूर : मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापुरात सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील नाळे कॉलनीतील निवासस्थानावर काढण्यात येणारा मोर्चा मंत्री पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असल्यामुळे रद्द करण्यात आला. सलग तीन वेळा पाटील यांनी हुलकावणी दिली असल्याची संतप्त प्रतिक्रिया गिरणी कामगारांकडून यावेळी उमटली. अखेर संभाजीनगर बसस्थानक येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मुंंबईत गिरणी कामगारांना मोफत घरे द्या, कामगारांच्या मुलांना नोकऱ्या द्या, कामगारांना रेशन द्या, मालकाला कर बसवा, गिरणी कामगाराला मोफत घर द्या, आदी मागण्यांसाठी शनिवारी सर्व श्रमिक संघ, कोल्हापूर (गिरणी कामगार विभाग) यांच्यातर्फे संभाजीनगरातील नाळे कॉलनीमधील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार होता; परंतु चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर येथील दौऱ्यावर असल्यामुळे मोर्चा काढू नका, अशी विनंती जुना राजवाडा पोलिसांनी केली. या विनंतीला मान देऊन जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार संभाजीनगर बसस्थानकात जमले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्व श्रमिक संघ कोल्हापूरचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, उन्हाळी अधिवेशनानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे पाटील यांच्या निवासस्थानावरील हा मोर्चा रद्द करण्यात आला. यावेळी संघटक दत्तात्रय अत्याळकर म्हणाले, २००५ पासून या न्याय्य मागण्यांसाठी लढा देत आहोत; पण तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर आले, तरीही अद्याप गिरणी कामगारांना न्याय मिळालेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत शब्द पाळावा. दिघे म्हणाले, गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी यापूर्वी तीन वेळा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितले. पहिल्यांदा शासकीय विश्रामगृह, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला; पण पालकमंत्री पाटील त्या ठिकाणी नव्हते. त्यानंतर संभाजीनगरातील निवासस्थानावर मोर्चा काढणार असे सांगितले होते; पण ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असून, त्यांनी ९ एप्रिलनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे. यावेळी शांताराम पाटील (आजरा), गोपाळ गावडे (चंदगड), रामजी देसाई, अमृत कोकितकर (गडहिंग्लज), कृष्णात चौगले (राधानगरी), बाजीराव पाटील (कागल), धनाजी पाटील (भुदरगड), तुकाराम तळप (शाहूवाडी) यांच्यासह गिरणी कामगार उपस्थित होते.