शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’, ‘राजाराम’च्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना बळ

By admin | Updated: June 16, 2015 01:17 IST

सतेज पाटील : पाच लाख एकवीस हजार विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप होणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ व राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवून गटाची बांधणी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केले.कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात सतेज पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांच्या स्वरूपात जमा झालेल्या वह्यांचे वाटप झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, संगीता देवेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सदाशिव चरापले, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यंदा एक लाख सात हजार ५१३ वह्या पाच लाख २१ हजार ४०१ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना सतेज पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप झाले. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद व महापालिकेच्या ४००हून अधिक शाळांमध्ये एकाचवेळी वह्यांचे वाटप होणार आहे.माजी मंत्री पाटील म्हणाले, २००७ पासून वाढदिवसानिमित्त हार-तुऱ्यांऐवजी वह्या संकलित करण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. २०१५च्या निवडणुकीतील पराभवाने आपण सर्वजण दोन पावले मागे गेलो होतो. मात्र, कार्यकर्त्यांशी असलेला ऋणानुबंध पाहता वह्या संकलनास चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन मोठे झाल्यावर आपण शिकलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी.प्रल्हाद चव्हाण म्हणाले, जीवनात हार-जीत होत असते. सूर्यालाही ग्रहण लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही. सतेज पाटील यांनी खचून न जाता आपले काम सुरू ठेवले आहे. सर्वसामान्यांसाठी झगडणारा लढाऊ नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मंगल वळकुंजे, मनीषा वास्कर, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगले, पृथ्वीराज पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, नगरसेवक उदय जाधव, दिलीप टिपुगडे, प्राचार्य महादेव नरके, आदींसह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)जनतेला आता आपली चूक कळली : चव्हाणपराभवानंतरही सतेज पाटील यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. त्यांनी ते असेच सुरू ठेवावे. भविष्यात निश्चित यश मिळेल. कारण जनतेला आता आपली चूक कळली आहे, अशी अप्रत्यक्ष टीका प्रल्हाद चव्हाण यांनी केली.