शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

‘गोकुळ’, ‘राजाराम’च्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना बळ

By admin | Updated: June 16, 2015 01:17 IST

सतेज पाटील : पाच लाख एकवीस हजार विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप होणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ व राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवून गटाची बांधणी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केले.कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात सतेज पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांच्या स्वरूपात जमा झालेल्या वह्यांचे वाटप झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, संगीता देवेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सदाशिव चरापले, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यंदा एक लाख सात हजार ५१३ वह्या पाच लाख २१ हजार ४०१ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना सतेज पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप झाले. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद व महापालिकेच्या ४००हून अधिक शाळांमध्ये एकाचवेळी वह्यांचे वाटप होणार आहे.माजी मंत्री पाटील म्हणाले, २००७ पासून वाढदिवसानिमित्त हार-तुऱ्यांऐवजी वह्या संकलित करण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. २०१५च्या निवडणुकीतील पराभवाने आपण सर्वजण दोन पावले मागे गेलो होतो. मात्र, कार्यकर्त्यांशी असलेला ऋणानुबंध पाहता वह्या संकलनास चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन मोठे झाल्यावर आपण शिकलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी.प्रल्हाद चव्हाण म्हणाले, जीवनात हार-जीत होत असते. सूर्यालाही ग्रहण लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही. सतेज पाटील यांनी खचून न जाता आपले काम सुरू ठेवले आहे. सर्वसामान्यांसाठी झगडणारा लढाऊ नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मंगल वळकुंजे, मनीषा वास्कर, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगले, पृथ्वीराज पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, नगरसेवक उदय जाधव, दिलीप टिपुगडे, प्राचार्य महादेव नरके, आदींसह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)जनतेला आता आपली चूक कळली : चव्हाणपराभवानंतरही सतेज पाटील यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. त्यांनी ते असेच सुरू ठेवावे. भविष्यात निश्चित यश मिळेल. कारण जनतेला आता आपली चूक कळली आहे, अशी अप्रत्यक्ष टीका प्रल्हाद चव्हाण यांनी केली.