शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

कर्मचाऱ्यांचा पगार रोखला

By admin | Updated: December 27, 2015 01:29 IST

कागल नगरपालिका : घर वसुली थकल्याने मुख्याधिकाऱ्यांनी उचचले पाऊल

कागल : घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली करण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून कागल नगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर २०१५ या महिन्याचा पगार मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी रोखला असल्याने कर्मचारी वर्गात ‘अस्वस्थता’ पसरली आहे. दर महिन्याच्या पाच-सहा तारखेला होणारा पगार महिनाअखेर आली तरी खात्यावर जमा झाला नसल्याने कर्मचारी वर्गाची आर्थिक कुचंबणा झाली आहे. दुसऱ्या बाजूला करांची वसुली नाही तर पगाराला पैसे कोठून आणायचे? असा पवित्रा मुख्याधिकारी यांनी घेतला आहे. यामुळे यातून कसा मार्ग काढायचा या प्रश्नात कर्मचारी अडकले आहेत, तर विधान परिषदेच्या सहलीमुळे लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. नगरपालिकेकडे १२० कर्मचारी आहेत. त्यापैकी १८ कायम कामगार आणि ३० ठेकेदारीचे कामगार करवसुली विभागात काम करतात. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात पालिकेला २ कोटी ३० लाख रुपये घरफाळा पाणीपट्टी वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत दहा महिन्यांत केवळ १० टक्के म्हणजे २३ लाख रुपयेच वसूल झाले आहेत. पालिकेकडे दाखल्यासाठी किंवा कोणतीतरी परवानगीसाठी व्यक्ती आली की आधी त्याची घरफाळा-पाणीपट्टी जमा करून घेतली जाते. अशा वसुलीचाही या १० टक्क््यांमध्ये समावेश आहे. मग कर्मचाऱ्यांनी नेमकी वसुली किती केली असा प्रश्न आहे, तर कर्मचारी वर्ग म्हणतो की, कागल शहरातील नागरिक जानेवारी, फेबु्रवारी, मार्च या तीन महिन्यांतच घरफाळा व विविध कर भरण्याच्या मानसिकतेत असल्याने आता अपेक्षित वसूल झालेला नाही. पगार थांबविल्याने कर्मचारी वर्ग आर्थिक कुचंबणेत सापडला आहे. हातउसने, कर्ज, खासगी सावकार याचा आश्रय घेतला जात आहे, तर पगारापोटी काढलेल्या कर्जावर व्याजाचा बोजा पडला आहे. या वर्षाअखेर आलेल्या सलग सुट्याही एन्जॉय करण्याचा बेत यामुळे रद्द करावा लागला आहे. मुख्याधिकारी पत्की यांनी कठोर निर्णय घेत करनिरीक्षक अभिजित गोरे यांचा कार्यभारही या कारणास्तव काढून घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)