शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

कुरुंदवाडमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कर्मचारी धारेवर : आदर्श नगरमधील महिला संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

दरम्यान, दोन महिन्यांत पालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शहरातील अतिक्रमण ...

दरम्यान, दोन महिन्यांत पालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शहरातील अतिक्रमण विषय, पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधीविरोधातील आवाज अधिक घट्ट होत असल्याने लोकप्रतिनिधींची डोकेदुखी वाढली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजना जुनी असल्याने या जलवाहिनीला वारंवार गळती लागणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचे प्रकार वाढले आहेत. येथील आदर्श नगरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे, लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त महिलांनी थेट पालिकाच गाठली. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत गाऱ्हाणे मांडून संताप व्यक्त केला.

पाणीपुरवठा अधिकारी गैरहजर असल्याने कर्मचाऱ्यांनी महिलांची समजूत घालत दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने महिला शांत झाल्या. यावेळी आदर्श नगरमधील स्नेहल तावदारे, सन्मती आलासे, शोभा बाबर, सुगंधा पवार, जयश्री हुन्नळे, रेखा तावदारे, रमेजा अपराध, सुशिली बनछोडे, पूजा चव्हाण, रेखा अडसूळ, गीता कारागीर, सुजाता माळी, विठ्ठल पवार, किरण मालगावे आदींची उपस्थिती होती.