शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

पेटलेल्या चितेबरोबरच भावनांचाही कल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST

कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या ...

कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या मनाची अवस्था आहे; परंतु गेले वर्षभर कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतोय, मन फार व्याकुळ होऊन गेलंय. पेटलेल्या चितेबरोबरच मनातील भावनांचाही कल्लोळ माजलेला आहे. प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिला की हात जोडून प्रार्थना करतोय...भगवंता आता हे सगळं थांबव बाबा... अशी वेळ पुन्हा माणसांवर आणू नकोस.

पंचगंगा स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करीत असलेल्या बाळासाहेब भोसले या महानगरपालिका कर्मचाऱ्याची ही आंतरिक विनंती परमेश्वर ऐकणार की नाही माहीत नाही, पण ज्याच्या घरातील व्यक्ती मृत्यू होतात, त्यांना जेवढ्या वेदना होतात तितक्याच वेदनांनी भोसलेसुद्धा व्याकुळ होतात. मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे क्रियाकर्म पार पाडत असताना एकीकडे मृताच्या नातेवाइकांना आधार देणं, त्यांना मदत करणे यांसह स्वत:च्या आतील भावनांनाही वाट करून देण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागत आहे.

कोविड साथीत मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने स्मशानभूमीतील कामाचा ताणही प्रचंड आहे. तरीही न थकता, न दमता वीसहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. नेहमीच्या कामापेक्षा सध्याचं काम अधिक जोखमीचं, धोकादायक आहे. स्वत:च्या जीवाला जपण्यापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. ज्या स्मशानभूमीत लोक जायला घाबरायला लागले आहेत तिथे हे कर्मचारी काम करत आहेत.

आम्ही मानवतेचे वारस..

प्रत्येक दिवशी रुग्णालयातून एका एका वाहनातून चार पाच मृतदेह आणले जातात. मृतदेहावर चिकटवलेल्या लेबलवर त्या व्यक्तीचे नाव असते. त्याप्रमाणे आधी नोंद केली जाते. नंतर मृतदेह खाली उतरुन घेतला जातो. जागा उपलब्धतेनुसार सरणावर किंवा गॅस दाहिनीत ठेवून अंत्यसंस्कार करतो. रक्तातील नातेवाईक कोणीच जवळ नसतो. आम्हीच त्यांचे नातेवाईक बनतो, रक्ताचे नसलो तरी मानवतेचे वारस आम्हीच असतो. जड अंत:करणाने अग्नी देतो. चिता शांत झाली की रक्षा विसर्जनसुद्धा आम्हीच करतो, असे तेथील कर्मचारी गहिवरलेल्या स्वरात सांगत होते.

मुखात पाणी नाही, की शेवटचं दर्शन

काही नातेवाईक लांबूनच आम्हाला सांगतात, जरा चेहरा आम्हाला दाखवा. गयावया करतात; पण मृतदेह रुग्णालयातूनच गुंडाळून दिलेला असल्याने आणि आम्हाला तो सोडायचा नाही, अशा स्पष्ट सूचना असल्याने आम्हीच त्यांना म्हणतो.. माफ करा.. आम्ही चेहरा दाखवू शकत नाही. एरव्ही अंत्यदर्शन घेणे, शेवटी सरणावर गेल्यावर मुखात पाणी घालण्याचा एक भावनिक विधी होतो, पण यावेळी ते शक्य नाही. शेवटचं दर्शन नाही, की मुखात पाणी नाही. नातेसंबंधाने हक्क असूनही अग्नी देण्याची साेय राहिली नाही. माणूस माणसाला परका झाला आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर भगवंताला विनंती करतोय.... भगवंता हे सारं थांबवं. इतका पण क्रूर वागवू नकोस!

-अख्ख गाव ध्यानस्थ बसलं -

लांजातील एका व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. त्याचा मुलगा सांगत होता. माझे वडील खूप चांगले होते. गावासाठी, गावातील नागरिकांसाठी त्यांनी भरपूर केलं. कोरोनाने आजारी पडले बरे व्हावेत म्हणून अख्खं गाव आठ दिवस ध्यानस्थ बसले. पण आज त्यांचा चेहरा गावालाच काय कुणालाच पहायला मिळाला नाही. ही आठवण सांगताना चांगली माणसंसुध्दा या साथीने ओढून नेल्याची भावना कर्मचारी व्यक्त करतात..