शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेल्या चितेबरोबरच भावनांचाही कल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST

कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या ...

कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या मनाची अवस्था आहे; परंतु गेले वर्षभर कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतोय, मन फार व्याकुळ होऊन गेलंय. पेटलेल्या चितेबरोबरच मनातील भावनांचाही कल्लोळ माजलेला आहे. प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिला की हात जोडून प्रार्थना करतोय...भगवंता आता हे सगळं थांबव बाबा... अशी वेळ पुन्हा माणसांवर आणू नकोस.

पंचगंगा स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करीत असलेल्या बाळासाहेब भोसले या महानगरपालिका कर्मचाऱ्याची ही आंतरिक विनंती परमेश्वर ऐकणार की नाही माहीत नाही, पण ज्याच्या घरातील व्यक्ती मृत्यू होतात, त्यांना जेवढ्या वेदना होतात तितक्याच वेदनांनी भोसलेसुद्धा व्याकुळ होतात. मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे क्रियाकर्म पार पाडत असताना एकीकडे मृताच्या नातेवाइकांना आधार देणं, त्यांना मदत करणे यांसह स्वत:च्या आतील भावनांनाही वाट करून देण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागत आहे.

कोविड साथीत मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने स्मशानभूमीतील कामाचा ताणही प्रचंड आहे. तरीही न थकता, न दमता वीसहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. नेहमीच्या कामापेक्षा सध्याचं काम अधिक जोखमीचं, धोकादायक आहे. स्वत:च्या जीवाला जपण्यापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. ज्या स्मशानभूमीत लोक जायला घाबरायला लागले आहेत तिथे हे कर्मचारी काम करत आहेत.

आम्ही मानवतेचे वारस..

प्रत्येक दिवशी रुग्णालयातून एका एका वाहनातून चार पाच मृतदेह आणले जातात. मृतदेहावर चिकटवलेल्या लेबलवर त्या व्यक्तीचे नाव असते. त्याप्रमाणे आधी नोंद केली जाते. नंतर मृतदेह खाली उतरुन घेतला जातो. जागा उपलब्धतेनुसार सरणावर किंवा गॅस दाहिनीत ठेवून अंत्यसंस्कार करतो. रक्तातील नातेवाईक कोणीच जवळ नसतो. आम्हीच त्यांचे नातेवाईक बनतो, रक्ताचे नसलो तरी मानवतेचे वारस आम्हीच असतो. जड अंत:करणाने अग्नी देतो. चिता शांत झाली की रक्षा विसर्जनसुद्धा आम्हीच करतो, असे तेथील कर्मचारी गहिवरलेल्या स्वरात सांगत होते.

मुखात पाणी नाही, की शेवटचं दर्शन

काही नातेवाईक लांबूनच आम्हाला सांगतात, जरा चेहरा आम्हाला दाखवा. गयावया करतात; पण मृतदेह रुग्णालयातूनच गुंडाळून दिलेला असल्याने आणि आम्हाला तो सोडायचा नाही, अशा स्पष्ट सूचना असल्याने आम्हीच त्यांना म्हणतो.. माफ करा.. आम्ही चेहरा दाखवू शकत नाही. एरव्ही अंत्यदर्शन घेणे, शेवटी सरणावर गेल्यावर मुखात पाणी घालण्याचा एक भावनिक विधी होतो, पण यावेळी ते शक्य नाही. शेवटचं दर्शन नाही, की मुखात पाणी नाही. नातेसंबंधाने हक्क असूनही अग्नी देण्याची साेय राहिली नाही. माणूस माणसाला परका झाला आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर भगवंताला विनंती करतोय.... भगवंता हे सारं थांबवं. इतका पण क्रूर वागवू नकोस!

-अख्ख गाव ध्यानस्थ बसलं -

लांजातील एका व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. त्याचा मुलगा सांगत होता. माझे वडील खूप चांगले होते. गावासाठी, गावातील नागरिकांसाठी त्यांनी भरपूर केलं. कोरोनाने आजारी पडले बरे व्हावेत म्हणून अख्खं गाव आठ दिवस ध्यानस्थ बसले. पण आज त्यांचा चेहरा गावालाच काय कुणालाच पहायला मिळाला नाही. ही आठवण सांगताना चांगली माणसंसुध्दा या साथीने ओढून नेल्याची भावना कर्मचारी व्यक्त करतात..