शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उदगाव बनले अपघातांचा ‘हॉट स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST

उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये ...

उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यामध्ये कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, रस्ते सुधारणा करण्यात असलेल्या अडचणी, स्थानिक प्रश्न हे कळीचे मुद्दे आहेत. परंतु वारंवार घडणाऱ्या अपघाताने उदगाव हे गाव अपघातांचा हॉट स्पॉट ठरले आहे.

उदगाव येथे कोल्हापूरला जाण्यासाठी जयसिंगपूर मार्गे व जैनापूर बायपास मार्गे नेहमी रहदारी असते. ऊस वाहतूक, औद्योगिक वसाहतीची आवक-जावक ही प्रामुख्याने याच मार्गावरून होते. अवजड वाहनेही शिरोळ बायपास मार्गे नेण्यात यावीत असे स्पष्ट आदेश असताना देखील, वाहन चालकांच्या मनमानीमुळे वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रकारामुळे गेल्या महिन्याभरात तब्बल सात जणांनी आपला जीव गमावला आहे.

रेल्वे ब्रीज ते रिलायन्स पंप येथे अरुंद रस्त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर जैनापूर फाटा येथे ऊस वाहतूक वाहनांमुळे चार ते पाच छोटे-मोठे अपघात झाले आहेत. मोठ्या वाहनधारकांनी उदगाव मार्गे जयसिंगपूरला वाहतूक न करता बायपास मार्गे केली, तरच या अपघातांचे प्रमाण कमी होईल. शिवाय अरुंद रस्ते असल्याने अपघातप्रवण क्षेत्राची विशेष सुधारणा करणे गरजेचे असल्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

--------------

कोट -

सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्रवास करत असताना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांची नोंद झालेली आहे. यामुळे उदगाव परिसरात शेतकरी व पादचारी हे भीतीग्रस्त बनले आहेत. यावर शासनाने तात्काळ मार्ग काढावा.

- कलिमुन नदाफ, सरपंच, उदगाव

फोटो - ०६०४२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ -

उदगाव (ता. शिरोळ) येथे अपघातानंतर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.