शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

उदगाव बनले अपघातांचा ‘हॉट स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST

उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये ...

उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यामध्ये कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, रस्ते सुधारणा करण्यात असलेल्या अडचणी, स्थानिक प्रश्न हे कळीचे मुद्दे आहेत. परंतु वारंवार घडणाऱ्या अपघाताने उदगाव हे गाव अपघातांचा हॉट स्पॉट ठरले आहे.

उदगाव येथे कोल्हापूरला जाण्यासाठी जयसिंगपूर मार्गे व जैनापूर बायपास मार्गे नेहमी रहदारी असते. ऊस वाहतूक, औद्योगिक वसाहतीची आवक-जावक ही प्रामुख्याने याच मार्गावरून होते. अवजड वाहनेही शिरोळ बायपास मार्गे नेण्यात यावीत असे स्पष्ट आदेश असताना देखील, वाहन चालकांच्या मनमानीमुळे वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रकारामुळे गेल्या महिन्याभरात तब्बल सात जणांनी आपला जीव गमावला आहे.

रेल्वे ब्रीज ते रिलायन्स पंप येथे अरुंद रस्त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर जैनापूर फाटा येथे ऊस वाहतूक वाहनांमुळे चार ते पाच छोटे-मोठे अपघात झाले आहेत. मोठ्या वाहनधारकांनी उदगाव मार्गे जयसिंगपूरला वाहतूक न करता बायपास मार्गे केली, तरच या अपघातांचे प्रमाण कमी होईल. शिवाय अरुंद रस्ते असल्याने अपघातप्रवण क्षेत्राची विशेष सुधारणा करणे गरजेचे असल्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

--------------

कोट -

सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्रवास करत असताना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांची नोंद झालेली आहे. यामुळे उदगाव परिसरात शेतकरी व पादचारी हे भीतीग्रस्त बनले आहेत. यावर शासनाने तात्काळ मार्ग काढावा.

- कलिमुन नदाफ, सरपंच, उदगाव

फोटो - ०६०४२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ -

उदगाव (ता. शिरोळ) येथे अपघातानंतर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.