शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

उदगाव बनले अपघातांचा ‘हॉट स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST

उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये ...

उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यामध्ये कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, रस्ते सुधारणा करण्यात असलेल्या अडचणी, स्थानिक प्रश्न हे कळीचे मुद्दे आहेत. परंतु वारंवार घडणाऱ्या अपघाताने उदगाव हे गाव अपघातांचा हॉट स्पॉट ठरले आहे.

उदगाव येथे कोल्हापूरला जाण्यासाठी जयसिंगपूर मार्गे व जैनापूर बायपास मार्गे नेहमी रहदारी असते. ऊस वाहतूक, औद्योगिक वसाहतीची आवक-जावक ही प्रामुख्याने याच मार्गावरून होते. अवजड वाहनेही शिरोळ बायपास मार्गे नेण्यात यावीत असे स्पष्ट आदेश असताना देखील, वाहन चालकांच्या मनमानीमुळे वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रकारामुळे गेल्या महिन्याभरात तब्बल सात जणांनी आपला जीव गमावला आहे.

रेल्वे ब्रीज ते रिलायन्स पंप येथे अरुंद रस्त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर जैनापूर फाटा येथे ऊस वाहतूक वाहनांमुळे चार ते पाच छोटे-मोठे अपघात झाले आहेत. मोठ्या वाहनधारकांनी उदगाव मार्गे जयसिंगपूरला वाहतूक न करता बायपास मार्गे केली, तरच या अपघातांचे प्रमाण कमी होईल. शिवाय अरुंद रस्ते असल्याने अपघातप्रवण क्षेत्राची विशेष सुधारणा करणे गरजेचे असल्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

--------------

कोट -

सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्रवास करत असताना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांची नोंद झालेली आहे. यामुळे उदगाव परिसरात शेतकरी व पादचारी हे भीतीग्रस्त बनले आहेत. यावर शासनाने तात्काळ मार्ग काढावा.

- कलिमुन नदाफ, सरपंच, उदगाव

फोटो - ०६०४२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ -

उदगाव (ता. शिरोळ) येथे अपघातानंतर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.