शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

पाटबंधारे कर्मचाऱ्यांना कोंडले

By admin | Updated: November 16, 2016 00:41 IST

निढोरीतील घटना : कालव्याला पाणीच नाही; शेतकऱ्यांचा उद्रेक

म्हाकवे : पाण्याच्या बाबतीत नेहमीच हेटाळणी करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत म्हाकवे, बानगे, आणूरसह सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये संताप खदखदत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी का मिळत नाही? केवळ पाणीपट्टीच वसुली करीत राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी निढोरी कार्यालयाला टाळे लावून सर्वच कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडले. येथील शेतकरी कालव्यातून पाणी मिळत नसल्याबाबत वारंवार टाहो फोडत असतानाही प्रशासन याकडे कानाडोळा का करते, हा मुद्दाच अनुत्तरित आहे. काळम्मावाडी धरणाच्या निढोरी कालव्यातून म्हाकवेकडील कालव्यात बुधवारी (दि. ९) सकाळी पाणी सोडले आहे. मात्र, हे पाणी सात दिवसांनंतरही बानगेपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळत असल्यानेच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी निढोरी कार्यालयावर मोर्चा काढून उद्रेकाला वाट करून दिली. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, रामचंद्र चौगुले, आदींनी केले. यावेळी आंदोलनावेळी म्हाकवेचे उपसरपंच रमेश पाटील, विजय डाफळे, आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, भगवान पाटील (बानगे), श्रीकांत कदम, कुंडलिक गमनिक, बाळासो मेथे (बानगे) यांसह आणूर, हदनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर) ‘लोकमत’चे आभार म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांनाही निढोरी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी कच्च्या कालव्याची डागडुजी, सुरुवातीच्या गावांत उपसाबंदी, नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणे आवश्यक, आदी उपाययोजना सुचवत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येथील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बळकटी मिळाल्याच्या प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले. १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळल्या सात दिवसांनंतरही पाणी बानगेपर्यंंत पोहोचले नसल्याने उद्रेक