शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाटबंधारे कर्मचाऱ्यांना कोंडले

By admin | Updated: November 16, 2016 00:41 IST

निढोरीतील घटना : कालव्याला पाणीच नाही; शेतकऱ्यांचा उद्रेक

म्हाकवे : पाण्याच्या बाबतीत नेहमीच हेटाळणी करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत म्हाकवे, बानगे, आणूरसह सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये संताप खदखदत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी का मिळत नाही? केवळ पाणीपट्टीच वसुली करीत राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी निढोरी कार्यालयाला टाळे लावून सर्वच कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडले. येथील शेतकरी कालव्यातून पाणी मिळत नसल्याबाबत वारंवार टाहो फोडत असतानाही प्रशासन याकडे कानाडोळा का करते, हा मुद्दाच अनुत्तरित आहे. काळम्मावाडी धरणाच्या निढोरी कालव्यातून म्हाकवेकडील कालव्यात बुधवारी (दि. ९) सकाळी पाणी सोडले आहे. मात्र, हे पाणी सात दिवसांनंतरही बानगेपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळत असल्यानेच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी निढोरी कार्यालयावर मोर्चा काढून उद्रेकाला वाट करून दिली. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, रामचंद्र चौगुले, आदींनी केले. यावेळी आंदोलनावेळी म्हाकवेचे उपसरपंच रमेश पाटील, विजय डाफळे, आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, भगवान पाटील (बानगे), श्रीकांत कदम, कुंडलिक गमनिक, बाळासो मेथे (बानगे) यांसह आणूर, हदनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर) ‘लोकमत’चे आभार म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांनाही निढोरी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी कच्च्या कालव्याची डागडुजी, सुरुवातीच्या गावांत उपसाबंदी, नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणे आवश्यक, आदी उपाययोजना सुचवत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येथील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बळकटी मिळाल्याच्या प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले. १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळल्या सात दिवसांनंतरही पाणी बानगेपर्यंंत पोहोचले नसल्याने उद्रेक