शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

पाटबंधारे कर्मचाऱ्यांना कोंडले

By admin | Updated: November 16, 2016 00:41 IST

निढोरीतील घटना : कालव्याला पाणीच नाही; शेतकऱ्यांचा उद्रेक

म्हाकवे : पाण्याच्या बाबतीत नेहमीच हेटाळणी करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत म्हाकवे, बानगे, आणूरसह सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये संताप खदखदत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी का मिळत नाही? केवळ पाणीपट्टीच वसुली करीत राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी निढोरी कार्यालयाला टाळे लावून सर्वच कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडले. येथील शेतकरी कालव्यातून पाणी मिळत नसल्याबाबत वारंवार टाहो फोडत असतानाही प्रशासन याकडे कानाडोळा का करते, हा मुद्दाच अनुत्तरित आहे. काळम्मावाडी धरणाच्या निढोरी कालव्यातून म्हाकवेकडील कालव्यात बुधवारी (दि. ९) सकाळी पाणी सोडले आहे. मात्र, हे पाणी सात दिवसांनंतरही बानगेपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळत असल्यानेच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी निढोरी कार्यालयावर मोर्चा काढून उद्रेकाला वाट करून दिली. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, रामचंद्र चौगुले, आदींनी केले. यावेळी आंदोलनावेळी म्हाकवेचे उपसरपंच रमेश पाटील, विजय डाफळे, आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, भगवान पाटील (बानगे), श्रीकांत कदम, कुंडलिक गमनिक, बाळासो मेथे (बानगे) यांसह आणूर, हदनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर) ‘लोकमत’चे आभार म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांनाही निढोरी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी कच्च्या कालव्याची डागडुजी, सुरुवातीच्या गावांत उपसाबंदी, नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणे आवश्यक, आदी उपाययोजना सुचवत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येथील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बळकटी मिळाल्याच्या प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले. १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळल्या सात दिवसांनंतरही पाणी बानगेपर्यंंत पोहोचले नसल्याने उद्रेक