शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

‘एफआरपी’साठी आज एल्गार

By admin | Updated: November 5, 2015 23:50 IST

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेकडे लक्ष : जयसिंगपुरात एक लाख शेतकरी येणार

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या चौदाव्या ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकरकमी एफआरपी द्या, अशी भूमिका संघटनेची असून, ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा दावा ‘स्वाभिमानी’ने केला आहे. आज दुपारी दोन वाजता येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या या परिषदेत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. एफआरपीसाठी संघर्ष करायला तयार राहा, असे आवाहन स्वाभिमानीने केले असले तरी कारखानदारांनी साखरेचे दर घसरल्याचे कारण सांगून एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचे ठरविले आहे. यामुळे एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. ही कोंडी कशी फुटणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक साखर कारखाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर ठराव करून शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करू पाहत आहेत. वास्तविक ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार उसाची एफआरपी अर्थात किमान लाभकारी मूल्य कायद्याप्रमाणे ऊस तोड झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी देणे सर्वच कारखानदारांना बंधनकारक आहे. एफआरपीचे तुकडे केल्यास त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी आंदोलन छेडेल, तसेच प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यंदा एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज असून, कारखान्यांनी शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी, असा सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, स्वाभिमानीने ऊस परिषद यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. परिषदेला राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. यंदाची चौदावी ऊस परिषद ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने स्वाभिमानीने ठिकठिकाणी मेळावे, बैठका, मोटारसायकल रॅली काढून ऊस परिषदेची शेतकऱ्यांत जागृती केली आहे. कोंडी कशी फुटणार ?: दिशा आज ठरणारएफआरपीची सर्व रक्कम देणार, पण तीन टप्प्यांत देणार, अशी भूमिका साखर कारखानदारांची आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीसाठी आग्रही आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून, ‘स्वाभिमानी’ने सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप सरकार ही कोंडी कशी फोडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोल्हापूरहून विशेष पथकासह शिरोळ, हातकणंगले, वडगाव, कुरुंदवाड पोलीस ठाण्यांतील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने बायपास रस्त्यावरून सोडण्यात येणार आहेत, तर इचलकरंजी व जयसिंगपूरला येणारी वाहने उदगाव-शिरोळ बायपास रोडवरून सोडण्यात येणार आहेत. वाहनतळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, मादनाईक पंप, झेले चित्रमंदिर मागे, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोय केली आहे.- संतोष डोके, सहायक पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर