शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘एफआरपी’साठी आज एल्गार

By admin | Updated: November 5, 2015 23:50 IST

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेकडे लक्ष : जयसिंगपुरात एक लाख शेतकरी येणार

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या चौदाव्या ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकरकमी एफआरपी द्या, अशी भूमिका संघटनेची असून, ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा दावा ‘स्वाभिमानी’ने केला आहे. आज दुपारी दोन वाजता येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या या परिषदेत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. एफआरपीसाठी संघर्ष करायला तयार राहा, असे आवाहन स्वाभिमानीने केले असले तरी कारखानदारांनी साखरेचे दर घसरल्याचे कारण सांगून एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचे ठरविले आहे. यामुळे एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. ही कोंडी कशी फुटणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक साखर कारखाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर ठराव करून शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करू पाहत आहेत. वास्तविक ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार उसाची एफआरपी अर्थात किमान लाभकारी मूल्य कायद्याप्रमाणे ऊस तोड झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी देणे सर्वच कारखानदारांना बंधनकारक आहे. एफआरपीचे तुकडे केल्यास त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी आंदोलन छेडेल, तसेच प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यंदा एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज असून, कारखान्यांनी शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी, असा सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, स्वाभिमानीने ऊस परिषद यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. परिषदेला राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. यंदाची चौदावी ऊस परिषद ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने स्वाभिमानीने ठिकठिकाणी मेळावे, बैठका, मोटारसायकल रॅली काढून ऊस परिषदेची शेतकऱ्यांत जागृती केली आहे. कोंडी कशी फुटणार ?: दिशा आज ठरणारएफआरपीची सर्व रक्कम देणार, पण तीन टप्प्यांत देणार, अशी भूमिका साखर कारखानदारांची आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीसाठी आग्रही आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून, ‘स्वाभिमानी’ने सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप सरकार ही कोंडी कशी फोडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोल्हापूरहून विशेष पथकासह शिरोळ, हातकणंगले, वडगाव, कुरुंदवाड पोलीस ठाण्यांतील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने बायपास रस्त्यावरून सोडण्यात येणार आहेत, तर इचलकरंजी व जयसिंगपूरला येणारी वाहने उदगाव-शिरोळ बायपास रोडवरून सोडण्यात येणार आहेत. वाहनतळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, मादनाईक पंप, झेले चित्रमंदिर मागे, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोय केली आहे.- संतोष डोके, सहायक पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर