शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वीज कामगारांचा ‘कायम’साठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 01:13 IST

आम्ही कंत्राटी कामगार दुरुस्ती, देखभाल, वीज बिल वसुली, सबस्टेशन आॅपरेटिंग, बिलिंगची कामे गेली १२ वर्षे करत आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली दहा ते पंधरा वर्षे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांमध्ये ‘कंत्राटी’ म्हणून कार्यरत असणाऱ्या कामगारांना ‘कायम करावे’ या मागणीसाठी जिल्ह्णातील कामगारांनी वीज विभागाच्या ताराबाई पार्कमधील कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर धरणे धरले. या कामगारांच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून केला. या तिन्ही कंपन्यांमधून कायमस्वरूपी नोकरभरती करताना डावलले जात आहे. कंपनीला तीन वर्षे कंत्राटी असलेले विद्युत सहाय्यक चालतात मग कामगार का चालत नाहीत, असा सवाल यावेळी या कामगारांनी उपस्थित केला. पुणे, मुंबई, नागपूर येथे आंदोलने केली. आम्ही कंत्राटी कामगार दुरुस्ती, देखभाल, वीज बिल वसुली, सबस्टेशन आॅपरेटिंग, बिलिंगची कामे गेली १२ वर्षे करत आहोत. त्यामुळेच आज कंपनी फायद्यात आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदा रानडे समिती त्यानंतर भाटिया समिती स्थापन केली. मात्र, २०१४ च्या विद्युत सहाय्यकाच्या निवडीवेळी पुन्हा कंत्राटी कामगारांवर अन्याय करण्यात आला. याबाबत १५ मेपर्यंत निर्णय न झाल्यास २२ मेपासून निर्णय न झाल्यास कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, मंडल सचिव अमल लोहार, कोषाध्यक्ष मधुकर माळी, अनिल लांडगे, रमेश थोरात, राजू जोशिलकर, भगवान खाडे, कॉ. कृष्णात तांबेकर यांच्यासह कामगार उपस्थित होते. पगारही वेळेत नाहीआमच्या काही कामगारांचा आठ आठ महिने पगार नाही. १२००० रुपयांपर्यंत पगार असताना प्रत्यक्षात सात-साडेसात हजार रुपयेच आम्हाला दिले जातात, अशी व्यथा यावेळी काही कामगारांनी व्यक्त केली. या वयात आम्हाला ‘कंत्राटी’पेक्षा ‘रोजंदारी’वर घेऊन नंतर कायम करावे, ही माफक अपेक्षा करत आहोत असे या कामगारांनी सांगितले.