शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

पवनचक्कीविरोधात एल्गार

By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST

बोलोलीत बैठक : बारा वाड्यांंतील शेतकरी उद्या काम बंद पाडणार

सांगरूळ : सातेरी महादेवाच्या डोंगरावर बोलोली, स्वयंभूवाडी, उपवडे, आमशीच्या डोंगरमाथ्यावर रविवारी सकाळी अचानक पवनचक्की उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे समजताच बारा वाड्या, वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी बोलोली येथे रविवारी बैठक घेऊन पवनचक्की विरोधात एल्गार पुकारला. उद्या, मंगळवारी तेथील काम बंद पाडण्याचा निर्धार केला असून, गुरुवारी शासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. करवीर तालुक्यातील बारा वाड्या-वस्त्यांचा लांडी खोरी या नावाने प्रसिद्ध असणारा बोलोली उपवडेसह परिसर उंच डोंगरमाथ्यामुळे प्रसिद्ध आहे. तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी उपवडेत लघुपाटबंधारे प्रकल्प बांधून परिसरात हरित क्र ांती निर्माण केली. यामुळे इथला शेतकरी सधन बनला; पण चार वर्षांत डोंगरमाथ्यावर चेन्नई, सातारा, कऱ्हाड येथील कंपन्यांनी राजकीय वरदहस्ताखाली शासकीय व शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून पवनचक्कीसाठी प्राथमिक स्वरूपाचे टॉवर उभे केले आहेत. दरम्यान, रविवारी अचानक पवनचक्कीच्या मुख्य कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यासाठी रस्ता केला आहे, तर वेगवेगळ्या मशीनद्वारे जमिनीची व हवेच्या दाबाची तपासणी केली. दरम्यान उद्या, या प्रकल्पाचे काम बंद पाडून आंदोलन करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला महादेव राणे, चंद्रकांत शिपेकर, देवबा राणे, लहू बाटे, विलास बाटे, सुनील कारंडे, संजय कारंडे, यशवंत पाटील, कृष्णात पाटील, संभाजी इर्गुले, भरत बाटे, सागर राणे यांच्यासह धनगरवाडा, शिपेकरवाडी, आरडेवाडी, इर्गुलेवाडी, कारंडेवाडी, स्वयंभूवाडी, विठ्ठलाईवाडी, अशा बारा वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांची मागणी : दुष्काळ लादू नकागेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उपवडे तलावही पूर्ण क्षमतेने भरला नाही. दुष्काळसदृश परिस्थिती असताना पवनचक्की उभारण्याचा घाट कशासाठी? अशी शेतकऱ्यांतून विचारणा होत आहे. हा पवनचक्की प्रकल्प शासनाचा की खासगी कंपन्यांचा, हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सध्या या डोंगरावर शतकोटी वृक्ष लागवडीमुळे चांगले जंगल तयार झाले आहे. ही झाडे तोडून पवनचक्क्या उभा करून आम्हा शेतकऱ्यांवर दुष्काळ लादू नका, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.