शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्कीविरोधात एल्गार

By admin | Updated: February 15, 2016 01:10 IST

बोलोलीत बैठक : बारा वाड्यांंतील शेतकरी उद्या काम बंद पाडणार

सांगरूळ : सातेरी महादेवाच्या डोंगरावर बोलोली, स्वयंभूवाडी, उपवडे, आमशीच्या डोंगरमाथ्यावर रविवारी सकाळी अचानक पवनचक्की उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे समजताच बारा वाड्या, वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी बोलोली येथे रविवारी बैठक घेऊन पवनचक्की विरोधात एल्गार पुकारला. उद्या, मंगळवारी तेथील काम बंद पाडण्याचा निर्धार केला असून, गुरुवारी शासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. करवीर तालुक्यातील बारा वाड्या-वस्त्यांचा लांडी खोरी या नावाने प्रसिद्ध असणारा बोलोली उपवडेसह परिसर उंच डोंगरमाथ्यामुळे प्रसिद्ध आहे. तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी उपवडेत लघुपाटबंधारे प्रकल्प बांधून परिसरात हरित क्र ांती निर्माण केली. यामुळे इथला शेतकरी सधन बनला; पण चार वर्षांत डोंगरमाथ्यावर चेन्नई, सातारा, कऱ्हाड येथील कंपन्यांनी राजकीय वरदहस्ताखाली शासकीय व शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून पवनचक्कीसाठी प्राथमिक स्वरूपाचे टॉवर उभे केले आहेत. दरम्यान, रविवारी अचानक पवनचक्कीच्या मुख्य कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यासाठी रस्ता केला आहे, तर वेगवेगळ्या मशीनद्वारे जमिनीची व हवेच्या दाबाची तपासणी केली. दरम्यान उद्या, या प्रकल्पाचे काम बंद पाडून आंदोलन करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला महादेव राणे, चंद्रकांत शिपेकर, देवबा राणे, लहू बाटे, विलास बाटे, सुनील कारंडे, संजय कारंडे, यशवंत पाटील, कृष्णात पाटील, संभाजी इर्गुले, भरत बाटे, सागर राणे यांच्यासह धनगरवाडा, शिपेकरवाडी, आरडेवाडी, इर्गुलेवाडी, कारंडेवाडी, स्वयंभूवाडी, विठ्ठलाईवाडी, अशा बारा वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांची मागणी : दुष्काळ लादू नकागेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उपवडे तलावही पूर्ण क्षमतेने भरला नाही. दुष्काळसदृश परिस्थिती असताना पवनचक्की उभारण्याचा घाट कशासाठी? अशी शेतकऱ्यांतून विचारणा होत आहे. हा पवनचक्की प्रकल्प शासनाचा की खासगी कंपन्यांचा, हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सध्या या डोंगरावर शतकोटी वृक्ष लागवडीमुळे चांगले जंगल तयार झाले आहे. ही झाडे तोडून पवनचक्क्या उभा करून आम्हा शेतकऱ्यांवर दुष्काळ लादू नका, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.