शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल अ‍ॅप्स्’वर अकरावी प्रवेशाची माहिती

By admin | Updated: May 25, 2016 00:25 IST

राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून तयारीला वेग

कोल्हापूर : शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता निर्माण करणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे पाऊल टाकणार आहे. विद्यार्थी, पालकांना त्यांच्या हातातील स्मार्टफोनवर मोबाईल अ‍ॅप्स्द्वारे यंदा प्रवेशाची अद्ययावत माहिती (अपडेटस्) मिळणार आहे. त्यादृष्टीने प्रवेश प्रक्रिया समितीची तयारी सुरू आहे.अकरावी प्रवेशासाठी शहरातील ३२ महाविद्यालयांमधील यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे यंदाचे सातवे वर्ष असून राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र आहे. ओएमआर शीट, संकेतस्थळानंतर आता मोबाईल अ‍ॅप्स्चा वापर केला जाणार आहे. प्रवेश अर्ज वितरण-स्वीकृती केंद्रे, प्रवेशाचे वेळापत्रकाच्या निश्चितीवर समितीतर्फे ३१ मेच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. कोल्हापूर शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३,५०० इतकी आहे. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, प्रक्रियेबाबत शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले की, गेल्यावर्षीप्रमाणे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ) या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती मिळेल.मोबाईल अ‍ॅप्स् ठरणार उपयुक्तप्रवेश प्रक्रियेची माहिती देणारे हे मोबाईल अ‍ॅप्स् मराठी भाषेमध्ये असणार आहे. त्यात गुणवत्ता यादी, प्रवेश मिळालेले महाविद्यालय, प्रवेशित झालेल्या जागा, आदींची माहिती मिळणार आहे. ‘गुगल’च्या प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्स् विद्यार्थी, पालकांना विनामूल्य डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्याच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन ते दिवसांत संबंधित अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी, पालकांवर मोठा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्स् उपयुक्त ठरणार असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वसंत हेळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, राजाराम महाविद्यालयाला यंदा पहिल्यांदाच अकरावी प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.