शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

‘मोबाईल अ‍ॅप्स्’वर अकरावी प्रवेशाची माहिती

By admin | Updated: May 25, 2016 00:25 IST

राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून तयारीला वेग

कोल्हापूर : शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता निर्माण करणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे पाऊल टाकणार आहे. विद्यार्थी, पालकांना त्यांच्या हातातील स्मार्टफोनवर मोबाईल अ‍ॅप्स्द्वारे यंदा प्रवेशाची अद्ययावत माहिती (अपडेटस्) मिळणार आहे. त्यादृष्टीने प्रवेश प्रक्रिया समितीची तयारी सुरू आहे.अकरावी प्रवेशासाठी शहरातील ३२ महाविद्यालयांमधील यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे यंदाचे सातवे वर्ष असून राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र आहे. ओएमआर शीट, संकेतस्थळानंतर आता मोबाईल अ‍ॅप्स्चा वापर केला जाणार आहे. प्रवेश अर्ज वितरण-स्वीकृती केंद्रे, प्रवेशाचे वेळापत्रकाच्या निश्चितीवर समितीतर्फे ३१ मेच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. कोल्हापूर शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३,५०० इतकी आहे. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, प्रक्रियेबाबत शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले की, गेल्यावर्षीप्रमाणे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ) या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती मिळेल.मोबाईल अ‍ॅप्स् ठरणार उपयुक्तप्रवेश प्रक्रियेची माहिती देणारे हे मोबाईल अ‍ॅप्स् मराठी भाषेमध्ये असणार आहे. त्यात गुणवत्ता यादी, प्रवेश मिळालेले महाविद्यालय, प्रवेशित झालेल्या जागा, आदींची माहिती मिळणार आहे. ‘गुगल’च्या प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्स् विद्यार्थी, पालकांना विनामूल्य डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्याच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन ते दिवसांत संबंधित अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी, पालकांवर मोठा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्स् उपयुक्त ठरणार असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वसंत हेळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, राजाराम महाविद्यालयाला यंदा पहिल्यांदाच अकरावी प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.