शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकरा गावांचा उद्यापासून पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: September 3, 2015 00:19 IST

थकबाकीपोटी जीवन प्राधीकरणाची कारवाई : गांधीनगर, कणेरी, उजळाईवाडी, उचगाव आदींचा समावेश

कोल्हापूर : गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगीसह अकरा गावांनी पाणीपट्टीच थकवल्याने या गावांचा शुक्रवार (दि. ४) पासून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने घेतला आहे. या गावांकडे तब्बल २ कोटी ५२ लाखांची थकबाकी असून, एकट्या उचगाव ग्रामपंचायतीकडे १ कोटी २५ लाख रूपये अडकल्याने प्राधीकरणच अडचणीत आले आहे.करवीर तालुक्याच्या पूर्वेकडील गांधीनगर, गडमुडशिंगी, वळीवडे, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरी, मोरेवाडी, उचगाव या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गांधीनगर प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना मे २००३ ला सुरू केली. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ही योजना कार्यरत आहे. पूर्वी या योजनेत हलसवडे, सांगवडे, सांगवडेवाडी, चिंचवाड, वसगडे या गावांचा समावेश होता, पण नंतर या गावांना वगळण्यात आले. या पाणी योजनेची बिले ग्रामपंचायतींना महिन्याला द्यावी लागतात. पण ही योजना सुरू झाल्यापासूनच थकबाकीचे गळते या योजनेला लागले आहे. हे गळते निघत नसल्याने संपूर्ण योजनाच अडचणीत आली आहे.आतापर्यंत या अकरा गावांकडे अडीच कोटीच थकबाकी आहे. त्यातील उचगाव ग्रामपंचायतीकडे १ कोटी २५ लाख रूपये थकीत असल्याने प्राधीकरण मेटाकुटीला आलेले आहे. प्राधीकरणाला योजनेचे वीज बिल महिन्याला १८ ते २० लाख रूपये येते, पण पाणीपट्टीची वसुलीच नसल्याने पैसे भरायचे कसे? असा पेच प्राधीकरणासमोर आहे. यापूर्वी दोन वेळा प्राधीकरणाने पाणीपुरवठा बंद केला होता. पैसे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गांधीनगर ग्रामपंचायतीचा चेक बाऊन्स गांधीनगर ग्रामपंचायतीने थकबाकीपोटी जीवन प्राधीकरणाला पुढील तारखेचा धनादेश दिला होता. पण हा धनादेश वटला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग ग्रामस्थांचा काय दोषअकरा गावांतील बहुतांशी ग्रामस्थ आपले पाण्याचे बिल वेळेत अदा करतात, पण तो पैसा ग्रामपंचायत इतरत्र खर्च करते. थकाबाकीपोटी प्राधीकरण पाणी बंद करणार, मग यात ‘त्या’ ग्रामस्थांचा काय दोष? असा सवाल उपस्थित केला जात आहे.