शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

हत्तींचा मुक्काम आजऱ्यासह भुदरगड तालुक्यांतच राहणार

By admin | Updated: February 16, 2015 23:10 IST

नुकसान सहन करावे लागणार : पश्चिम बंगालप्रमाणेच कर्नाटकातही हत्तींची संख्या वाढल्याचा परिणाम

कृष्णा सावंत - पेरणोली -- गव्यांच्या वास्तव्यानंतर आता टस्कराचाही वावर वाढू लागला आहे. कर्नाटकात हत्तींची संख्या प्रमाणापेक्षा जादा झाल्याने आणि टस्कराने कार्यक्षेत्र निश्चित केल्याने भविष्यात टस्कराचा वावर आजरा व भुदरगड तालुक्यांतच राहणार आहे.आजरा व भुदरगड तालुक्यांत गव्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात टस्करांचाही वावर आता दोन्ही तालुक्यांतच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.टस्कर शांत व संयमी आहे. तो आपल्या मार्गाने सरळ जातो. त्याने निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रात मार्गक्रमण करताना जुन्या व नव्या मार्गातील १५ फुटांच्या अंतरानेच चालतो. त्यामुळे झालीच तर एकाच मार्गावरील नुकसान होणार आहे.केळी व ऊस वगळता अन्य कोणत्याही पिकांची नुकसान टस्कर जाणीवपूर्वक करत नाही. त्याच्या पायामुळे होणारी नुकसान हीच खरी नुकसान आहे. तो सरळ मार्गाने जात असल्याने आतापर्यंत कोणावरही त्याने हल्ला केलेला नाही. कोणी तरी बिथरवले, तरच तो हल्ला करण्याची शक्यता आहेआजऱ्याच्या पश्चिम भागात दोन वर्षांपासून टस्कराचा वावर आहे. हाळोली, मसोली, वेळवट्टी, एरंडोळ, पोळगाव या ठिकाणी त्याचे वास्तव्य आहे. देवर्डे, पेरणोली, कोरीवडे, पाळाचा हुड्डा, अंतुर्ली, पाटगाव हा त्याचा मार्ग आहे. आजऱ्यामधून भुदरगड तालुक्यांत याच मार्गावरून तो सातत्याने जात आहे.पेरणोली, कोरिवडे परिसरात दोनवेळा टस्कर आला; परंतु तो एकाच मार्गाने जात असल्याने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान व जीवितहानी झाली नाही. पेरणोलीकरांनी त्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या जुन्या मार्गानेच त्याने भुदरगडमध्ये प्रवेश केला. त्यामुळे टस्कर आता आपल्यातलाच झाला असून, त्यानेही दोन्ही तालुक्यांतील परिसराला स्वीकारले आहे. त्यामुळे टस्करामुळे कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसल्याचे मत वन विभागाचे आहे.पश्चिम बंगालप्रमाणेच कर्नाटकातही हत्तींची संख्या जादा झाली आहे. त्यामुळे हा टस्कर जरी परत गेला, तरी दुसरा येणारच आहे. हत्तींचे स्थलांतर अटळ आहे. हत्तींना न बिथरवता त्याला मार्गक्रमण करू दिल्यास नुकसान कमी होऊ शकते. आतापर्यंत हत्तीमुळे एक टक्काही नुकसान झालेले नाही.- राजन देसाई, वनक्षेत्रपाल, आजरा