शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विजेचे भारनियमन नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 01:08 IST

प्रताप होगाडे : ऊर्जा नियामक आयोगाकडे दाद मागणार

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : राज्य शासनाच्या नियोजनशून्य व गलथान कारभारामुळे सध्या राज्यात सुरू असलेले चार हजार मेगावॅटचे वीज भारनियमन ऊर्जा आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करणारे आहे. यामुळे राज्यातील शेती, उद्योग, व्यापार व सर्वसामान्य ग्राहकांचे हाल व नुकसान होत आहे. अशा बेकायदेशीर भारनियमनाविरोधात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे राज्य वीज ग्राहक संघटनेच्यावतीने याचिका दाखल करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.सद्य:स्थितीस महाराष्ट्रामध्ये वीजनिर्मितीची क्षमता प्रचंड असून आणि वीजग्राहकांनी दरवर्षी तीन हजार कोटी रुपये जादा मोजूनसुद्धा वीज भारनियमन लादले गेले आहे, अशी टीका करून ग्राहक संघटनेचे अध्यक्ष होगाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, महावितरण कंपनीने ऊर्जा नियामक आयोगाकडे दिलेली माहिती व आकडेवारीनुसार कंपनीकडे सध्या ३३ हजार ५०० मेगावॅट वीज क्षमता आहे. कंपनीच्याच म्हणण्यानुसार ९ हजार मेगावॅट वीज अतिरिक्त आहे. विजेच्या मागणीअभावी निर्मिती प्रकल्प बंद ठेवावे लागतात व त्यांना किमान स्थिर आकार द्यावा लागतो. यासाठी महावितरणने आपल्या दरपत्रक याचिकेमध्ये दरवर्षी ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर ऊर्जा नियामक आयोगाने नोव्हेंबर २०१६ मध्ये आदेश देताना सन २०१७-१८ व २०१९-२० या तीन वर्षांसाठी ६,५०० ते ६००० मेगावॅट निश्चित केले आहे आणि त्यासाठी स्थिर आकाराची रक्कम देण्याकरिता दरवर्षी तीन हजार कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे किमान ६ हजार ५०० मेगावॅट अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तरी सध्याचे भारनियमन लावणे पूर्णपणे बेकायदेशीर व आयोगाच्या आदेशाविरोधात आहे. बंद प्रकल्प पुन्हा सुरू करावेतबंद ठेवलेले प्रकल्प पुन्हा सुरू करून वीज उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यासाठी विलंब लागत असल्यास खुल्या बाजाराच्या पॉवर एक्स्चेंजमधून किंवा खासगी पुरवठादारांकडून अल्प मुदतीने वीज खरेदी करावी. ज्यामुळे राज्यातील सर्व वीज ग्राहक भारनियमनमुक्त होतील, अशीही मागणी होगाडे यांनी या पत्रकात केली आहे.