शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

वीज दरवाढविरोधी राज्यव्यापी आंदोलन

By admin | Updated: February 20, 2015 23:16 IST

प्रताप होगाडे : मागणी ४७१७ कोटींची, प्रत्यक्षात १०,६२५ कोटींची वाढ; ११५ लाख घरगुती वीज ग्राहकांवर अन्यायी ३५ टक्के बोजा

इचलकरंजी : महावितरण कंपनीने वीज दरामध्ये ४७१७ कोटी रुपयांची वाढीची मागणी केली असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात १०,६२५ कोटी रुपयांची दरवाढ होत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर ३५ टक्के दरवाढीचा बोजा लादला जात आहे. अशा फसव्या दरवाढीला वीज ग्राहक संघटनांची समन्वय समिती विरोध दर्शविणार असून, राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.महावितरण कंपनीने अंतरिम आकाराचे ५०२२ कोटी रुपये व महानिर्मिती आकाराचे ८६६ कोटी रुपये अशी ५९०८ कोटी रुपयांची मार्च २०१३ अखेर आलेली महसुली तुटीची भरपाई मागितली होती. तिची वसुली जानेवारी २०१५ अखेर संपलेली आहे. तरीसुद्धा महावितरणने ही रक्कम विद्यमान वीजदरात गृहीत धरलेली आहे आणि त्यावर ४७१७ कोटी रुपयांची दरवाढ मागितली असली तरी ती प्रत्यक्षात १०,६२५ कोटी रुपये इतकी होते. म्हणजे महावितरण फक्त ८ ते १० टक्के इतकी दरवाढ म्हणत असले, तरी वीज ग्राहकांच्या माथ्यावर सरासरी ३५ टक्के दरवाढ लादली जात असल्याचे होगाडे यांनी स्पष्ट केले.होगाडे म्हणाले, सर्वांत अधिक वीजदर घरगुती वीज ग्राहकांना होत आहे. पूर्वी १०० युनिटसाठी वीज बिल ३७६ रुपये येत असे. आता ते ५०१ रुपये, तर २५० युनिटसाठी येणारे वीज बिल १२८३ रुपयांऐवजी १६९० रुपये येईल. याशिवाय इंधन अधिभार, वीज ड्युटी व टॅक्समध्ये वाढ वेगळी असेल. यंत्रमाग उद्योगासाठी २० अश्वशक्तीपर्यंत प्रति युनिट ८७ पैसे व २७ अश्वशक्तीवर १०४ पैसे वाढ होईल. दोन शिफ्टमध्ये चालणाऱ्या लघुउद्योगासाठी प्रतियुनिट १४७ पैसे व तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या लघुउद्योगासाठी १८० पैसे वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)महावितरणची मखलाशीवीज कायद्यान्वये महावितरण कंपनी एकावेळी १0 टक्क्यांहून अधिक दरवाढ मागू शकत नाही. त्यामुळे जानेवारी २०१५ अखेर झालेल्या वीज वसुलीचा (५९०८ कोटी रुपयांचा) अंतर्भाव गृहीत धरून त्यावर ४७१७ कोटी रुपयांची वीज दरवाढीची मागणी महावितरणने केली आहे.महाराष्ट्राची वीज दीडपट महागअन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची वीज दीडपट महाग असल्याचे सांगून होगाडे त्याविषयी माहिती देताना म्हणाले, उद्योगांसाठी कर्नाटकचा सरासरी वीजदर प्रतियुनिट ६ रुपये, गुजरातमध्ये ५.७० रुपये, आंध्र प्रदेशमध्ये ६.६० रुपये, मध्य प्रदेशमध्ये ६.७५ रुपये, छत्तीसगडमध्ये ५.४० रुपये, गोव्यामध्ये ३.५० रुपये इतके असून, महाराष्ट्रात मात्र विजेचा ९.७९ रुपये दर आहे.‘दाभोळ’ बंद पाडण्याचा घाट‘दाभोळ’ची ५.५० रुपये प्रतियुनिट असलेली वीज नाकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळी, पारस व खापरखेडा वीज प्रकल्पाची ६.५० रुपयांची वीज का घेत आहेत. त्याप्रमाणे ‘दाभोळ’ बंद पाडून तो गॅस उत्पादित करणाऱ्या रिलायन्सच्या घशात घालण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.