शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चांदोली धरण परिसराची वीज तोडली

By admin | Updated: June 24, 2015 00:44 IST

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई : आठ दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य

वारणावती : चांदोली धरणाच्या १ लाख ९८ हजार रुपयांच्या वीजबिलाच्या थकबाकीपैकी एक लाख रुपये पाटबंधारे खात्याने भरले आहेत. मात्र ९८ हजारांच्या थकित रकमेमुळे वीज कंपनीने वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. चार दिवस या परिसरात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पहाऱ्यासाठी असणाऱ्या पोलीस व पाटबंधारे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून, मुसळधार पावसात व अंधारात चांदोली धरणाची सुरक्षा करावी लागत आहे. चांदोली धरण परिसर अतिसंवेदनशील असल्याने वीज पुरवठा सुरळीत राहावा, अशी मागणी होत आहे.येथील पोलीस चौकीमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस सेवा बजावत आहेत, पण सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. धो-धो पाऊस आणि काळाकुट्ट अंधार अशातच ड्युटीवर असणाऱ्या पोलीस व पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून धरणाची सुरक्षा करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याने पोलीस चौकीजवळ दोन कुत्र्यांवर हल्ला केला असल्याच्या चर्चेने येथे अधिकच घबराट पसरली आहे. तातडीने अतिसंवेदनशील असणाऱ्या चांदोली धरणाचा वीजपुरवठा सुरू व्हावा, अशी तेथील कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत वारणावती येथील पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता ए. पी. निकम म्हणाले की, १ लाख ९८ हजार थकबाकीपोटी एक लाख रुपये भरले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित थकबाकी भरू, अशी विनंती महावितरणकडे केली आहे. संवेदनशील परिसर असल्याने याठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा आहे. महावितरणचे आरळा येथील शाखा अभियंता देशमाने म्हणाले की, आठ-दहा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे. वरिष्ठ कार्यालयाने आदेश दिल्यानंतर चांदोली धरणाचा वीजपुरवठा सुरू करू. (वार्ताहर)भीतीची छाया...चांदोली धरण परिसरातील मुसळधार पाऊस, चांदोली अभयारण्यातील हिंस्त्र प्राण्यांचे होणारे हल्ले यामुळे या परिसरातील लोकांना भीतीच्या छायेत राहावे लागत आहे. अशातच धरणाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.