शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग व्यवसायाला जुन्याच दराने वीज बिलाची आकारणी

By admin | Updated: August 3, 2015 00:09 IST

अनिल बाबर : मुंबईतील बैठकीत ऊर्जामंत्र्यांचे आश्वासनच; यंत्रमागधारकांना दिलासा

विटा : यंत्रमाग लघुउद्योगातील २७ अश्वशक्तीच्या खाली आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रमागाची वाढीव दराने आलेली वीजबिले जुन्या दरानेच भरून घेण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असून, यंत्रमागधारकांना जुन्या दरानेच वीजबिले भरण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आ. अनिल बाबर यांनी दिली.यंत्रमागाच्या वीजदरात फरक होता. नव्या दराने वीजबिले आकारली गेल्याने वाढीव वीजबिलाचा फटका यंत्रमागधारकांना बसला होता. त्या पार्श्वभूमीवर यंत्रमागांना जुन्या दराने वीजबिल आकारणी करावी, अशी मागणी यंत्रमागधारकांतून होत होती. त्यामुळे मुंबईत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह महावितरणचे मुख्य अभियंता सतीश बापट, संचालक अभिजित देशपांडे यांची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आ. अनिल बाबर यांनी रविवारी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली. आ. बाबर म्हणाले, वीज नियामक आयोगाने एक जूनपासून वीजदराची पुनर्रचना केली आहे. परंतु आयोगाने ठरवलेल्या तसेच राज्य शासनाच्या दरात वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे वीजदर कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे यावेळी बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबतचा प्रश्नही विधानसभेच्या अधिवेशात उपस्थित केला होता. राज्य शासन यंत्रमाग दरात कोणत्याही परिस्थितीत वाढ होऊ देणार नाही. प्रसंगी परिपत्रक रद्द करण्याची किंवा अनुदान देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले होते. त्यानंतरही राज्यभरातील यंत्रमागधारकांना वाढीव वीजबिले देण्यात आल्याने ऊर्जामंत्र्यांच्या दालनात आ. हाळवणकर यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आ. हाळवणकर यांनी यंत्रमागधारकास वाढीव वीजबिल लागू केल्यास व्यावसायिकांसमोर येणाऱ्या अडचणींची बैठकीत माहिती दिली.महावितरणच्या अभियंत्यांनी यंत्रमागाला जुन्या दरानुसार वीजबिले आकारणी करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आवश्यक निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने देण्याचा आदेश दिला असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले.यंत्रमागधारकांना जुन्या दरानेच वीजबिल आकारणी करावी, वाढीव वीज बिलाच्या कारणावरून कोणत्याही यंत्रमागधारकांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आ. बाबर म्हणाले. (वार्ताहर)