शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

दरवाढीविरोधात शुक्रवारी वीजबिलांची होळी

By admin | Updated: February 25, 2015 00:07 IST

इरिगेशन फेडरेशन आक्रमक : शेतकरी, उद्योजक होणार सहभागी

कोल्हापूर : वीज दरवाढ व वीज सवलत रद्द करण्याच्या ‘महावितरण’च्या निर्णयाविरोधात इरिगेशन फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी ‘महावितरण’च्या ताराबाई येथील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करणार असल्याची माहिती फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महावितरण’चे सर्वच ग्राहकांसाठीचे दर हे शेजारीला राज्यापेक्षा दुप्पट आहेत. हे दर सर्वसामान्य माणसाला झेपणारे नाहीत. इतर राज्यांप्रमाणे विजेचे दर दोन वर्षे स्थिर ठेवणे गरजेचे आहे. शासन आता वैयक्तिक सोलर पंप ही योजना आणू पाहत आहे; पण ही योजना शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्याची देखभाल व दुरुस्ती ही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. यापेक्षा फिडरनिहाय अथवा गावनिहाय सोयीस्कर शेतकऱ्यांच्या गटासाठी १ ते ३ मेगावॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प उभे करावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘महावितरण’ने कृषी पंपांबरोबरच अन्य ग्राहकांची वीज सवलत ताबडतोब सुरू करावी, सध्या असणारे वीज दर किमान दोन वर्षांसाठी स्थिर ठेवावेत; अन्यथा आंदोलन उभे करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व प्रताप होगाडे यांच्या उपस्थित ‘महावितरण’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतीपंपधारक, उद्योजक वीज बिलांची होळी करणार आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक व उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील व बाबासाहेब पाटील यांनी केले. आर. जी. तांबे, सखाराम चव्हाण, आर. के. पाटील, एस. ए. कुलकर्णी, विक्रांत पाटील, महादेव सुतार, मारुती पाटील उपस्थित होते.