शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पांडुरंगाच्या वारीत आली निवडणूक

By admin | Updated: June 25, 2015 01:07 IST

ग्रामपंचायत निवडणूक : मतदानादिवशीच वाखरीचे रिंगण

राजाराम लोंढे / कोल्हापूर राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी २५ जुलैला मतदान होत आहे; पण २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने पायी दिंडीसाठी रवाना झालेले लाखो भाविक मतदानापासून वंचित राहणार आहेत. तीन आठवड्यांच्या वारीत वाखरीचे गोल रिंगण महत्त्वाचे आहे. हे रिंंगण मतदानादिवशी म्हणजे २५ जुलैलाच होत असल्याने उमेदवारांनी कितीही ठरविले तरी वारकऱ्यांना मतदानासाठी गावाकडे आणणे त्यांना अशक्य आहे. शेकडो मतदार पंढरपूरच्या वाटेवर राहणार असल्याने गावकारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. राज्य निवडणूक आयोगाने भागवत धर्माच्या या मोठ्या सोहळ््याची दखल न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आषाढीअगोदर एकवीस दिवस कोल्हापूर जिल्ह्यातून पायी दिंड्या पंढरपूरला रवाना होतात. कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने यंदा ५ जुलैच्या दरम्यान पायी दिंड्या रवाना होणार आहेत. प्रत्येक गावातून तीन-चार दिंड्या पंढरपूरला जातात; त्यामुळे जिल्ह्यातून साधारणत: ६० ते ७० हजार भाविक पायी दिंडीतून जातात; पण याच दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ते १० जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, २५ जुलैला मतदान होणार आहे. त्यामुळे पायी वारीसाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान करणे अडचणीचे होणार आहे. २५ जुलैला दिंडी पंढरपूरनजीक पोहोचलेली असते. वारकारी वारी अर्धवट सोडून मतदानासाठी येण्याची शक्यता फारच कमी आहे. उमेदवारांनी जरी वारीसाठी गेलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था केली, तरी तीन आठवडे भक्तिभावाने सुरू केलेली वारी अर्धवट सोडण्याची अशा मतदारांची मानसिकता नसते.