शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

पांडुरंगाच्या वारीत आली निवडणूक

By admin | Updated: June 25, 2015 01:07 IST

ग्रामपंचायत निवडणूक : मतदानादिवशीच वाखरीचे रिंगण

राजाराम लोंढे / कोल्हापूर राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी २५ जुलैला मतदान होत आहे; पण २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने पायी दिंडीसाठी रवाना झालेले लाखो भाविक मतदानापासून वंचित राहणार आहेत. तीन आठवड्यांच्या वारीत वाखरीचे गोल रिंगण महत्त्वाचे आहे. हे रिंंगण मतदानादिवशी म्हणजे २५ जुलैलाच होत असल्याने उमेदवारांनी कितीही ठरविले तरी वारकऱ्यांना मतदानासाठी गावाकडे आणणे त्यांना अशक्य आहे. शेकडो मतदार पंढरपूरच्या वाटेवर राहणार असल्याने गावकारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. राज्य निवडणूक आयोगाने भागवत धर्माच्या या मोठ्या सोहळ््याची दखल न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आषाढीअगोदर एकवीस दिवस कोल्हापूर जिल्ह्यातून पायी दिंड्या पंढरपूरला रवाना होतात. कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने यंदा ५ जुलैच्या दरम्यान पायी दिंड्या रवाना होणार आहेत. प्रत्येक गावातून तीन-चार दिंड्या पंढरपूरला जातात; त्यामुळे जिल्ह्यातून साधारणत: ६० ते ७० हजार भाविक पायी दिंडीतून जातात; पण याच दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ते १० जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, २५ जुलैला मतदान होणार आहे. त्यामुळे पायी वारीसाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान करणे अडचणीचे होणार आहे. २५ जुलैला दिंडी पंढरपूरनजीक पोहोचलेली असते. वारकारी वारी अर्धवट सोडून मतदानासाठी येण्याची शक्यता फारच कमी आहे. उमेदवारांनी जरी वारीसाठी गेलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था केली, तरी तीन आठवडे भक्तिभावाने सुरू केलेली वारी अर्धवट सोडण्याची अशा मतदारांची मानसिकता नसते.