शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:22 IST

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे ...

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे सरपंच व विकास संस्थेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मारुतराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक निवडणुका अगदी जवळून पाहिल्या. त्यातील, सन १९७८ला सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आठवणीत राहण्यासारखी होती. कॉँग्रेसच्या फुटीनंतर एस कॉँग्रेसतर्फे श्रीपतराव बोंद्रे, राष्टÑीय कॉँग्रेसकडून मारुतराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते उभे होते. तत्कालीन राजकारणातील हे तीन दिग्गज एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असले तरी प्रचारात ईर्ष्या असायची पण द्वेष नसायचा, तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. मारुतराव खाडे यांची प्रचारयंत्रणा जरा वेगळी होती. सांगरूळसह बारा वाड्यांतील लोकं सकाळी उठून स्वत:च्या घरातून भाकरी बांधून प्रचारात सक्रिय व्हायचे. प्रचारासाठी आलिशान गाड्यांसह इतर सुविधा नव्हत्या. उलट मतदारसंघातील लोकांनीच खाडे यांना वर्गणी गोळा करून खर्चासाठी पैसे दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचारासाठी पैसे मागून घेण्याचा प्रश्नच नव्हता. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी मिळेल त्या वाहनांतून गावोगावी जायचे आणि प्रचार करायचा. पार्टीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे आठ-दहाजण तर पंधरा-पंधरा दिवस त्या-त्या भागातच तळ ठोकत होते. तेथेच कार्यकर्त्यांच्या घरात जेवायचे आणि त्या परिसरात प्रचार करत. उमेदवार त्या भागात प्रचारास गेला की मग त्यांची भेट व्हायची, या भागात कोणाला दुरूस्त करावे लागेल. याचा अहवाल दिला जायचा. त्या रात्री बसूनच पुढची रणनीती ठरवली जायची. एक-एक कार्यकर्ता तर निवडणूक संपेपर्यंत घराचे तोंड बघत नव्हते, इतकी निष्ठा नेत्यांवर असायची. तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारानिमित्त एकत्र यायचे पण कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद नसायचा. उलट ‘तुम्ही जोरात हाय, आमची काय डाळ शिजतीय’ असे बोलून वातावरण खेळीमेळीचे व्हायचे. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली तरी कुठेही संघर्ष झाला नाही. दुसऱ्या दिवशी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये मतमोजणी होती. काट्याची टक्कर असल्याने उमेदवारांसह मतमोजणी प्रतिनिधींवर कमालीचा तणाव होता. यामध्ये श्रीपतराव बोंद्रे हे थोड्या मतांनी विजयी झाले पण उमेदवारांनी खेळीमेळीत एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.या निवडणुका कोठे आणि आताच्या कुठे? आज निष्ठा म्हणजे काय असते? हे सांगण्याची वेळ आली आहे. त्याला एकटे कार्यकर्तेच जबाबदार आहेत, असे नाही, तर नेतेही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक निवडणुकीत दडपशाहीचे राजकारण करायचे, येनकेन प्रकारे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. हे टार्गेट ठेवून द्वेषाचे राजकारण सुरू आहे. परिणामी, खुल्या वातावरणात निवडणुका होत नाहीतच पण वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुकांमुळे लोकशाही जिवंत राहील का? हा तुमच्या-आमच्या समोरील खरा प्रश्न आहे.आनंदराव कासोटे, माजी सरपंच, सांगरूळ