शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:22 IST

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे ...

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे सरपंच व विकास संस्थेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मारुतराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक निवडणुका अगदी जवळून पाहिल्या. त्यातील, सन १९७८ला सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आठवणीत राहण्यासारखी होती. कॉँग्रेसच्या फुटीनंतर एस कॉँग्रेसतर्फे श्रीपतराव बोंद्रे, राष्टÑीय कॉँग्रेसकडून मारुतराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते उभे होते. तत्कालीन राजकारणातील हे तीन दिग्गज एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असले तरी प्रचारात ईर्ष्या असायची पण द्वेष नसायचा, तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. मारुतराव खाडे यांची प्रचारयंत्रणा जरा वेगळी होती. सांगरूळसह बारा वाड्यांतील लोकं सकाळी उठून स्वत:च्या घरातून भाकरी बांधून प्रचारात सक्रिय व्हायचे. प्रचारासाठी आलिशान गाड्यांसह इतर सुविधा नव्हत्या. उलट मतदारसंघातील लोकांनीच खाडे यांना वर्गणी गोळा करून खर्चासाठी पैसे दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचारासाठी पैसे मागून घेण्याचा प्रश्नच नव्हता. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी मिळेल त्या वाहनांतून गावोगावी जायचे आणि प्रचार करायचा. पार्टीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे आठ-दहाजण तर पंधरा-पंधरा दिवस त्या-त्या भागातच तळ ठोकत होते. तेथेच कार्यकर्त्यांच्या घरात जेवायचे आणि त्या परिसरात प्रचार करत. उमेदवार त्या भागात प्रचारास गेला की मग त्यांची भेट व्हायची, या भागात कोणाला दुरूस्त करावे लागेल. याचा अहवाल दिला जायचा. त्या रात्री बसूनच पुढची रणनीती ठरवली जायची. एक-एक कार्यकर्ता तर निवडणूक संपेपर्यंत घराचे तोंड बघत नव्हते, इतकी निष्ठा नेत्यांवर असायची. तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारानिमित्त एकत्र यायचे पण कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद नसायचा. उलट ‘तुम्ही जोरात हाय, आमची काय डाळ शिजतीय’ असे बोलून वातावरण खेळीमेळीचे व्हायचे. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली तरी कुठेही संघर्ष झाला नाही. दुसऱ्या दिवशी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये मतमोजणी होती. काट्याची टक्कर असल्याने उमेदवारांसह मतमोजणी प्रतिनिधींवर कमालीचा तणाव होता. यामध्ये श्रीपतराव बोंद्रे हे थोड्या मतांनी विजयी झाले पण उमेदवारांनी खेळीमेळीत एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.या निवडणुका कोठे आणि आताच्या कुठे? आज निष्ठा म्हणजे काय असते? हे सांगण्याची वेळ आली आहे. त्याला एकटे कार्यकर्तेच जबाबदार आहेत, असे नाही, तर नेतेही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक निवडणुकीत दडपशाहीचे राजकारण करायचे, येनकेन प्रकारे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. हे टार्गेट ठेवून द्वेषाचे राजकारण सुरू आहे. परिणामी, खुल्या वातावरणात निवडणुका होत नाहीतच पण वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुकांमुळे लोकशाही जिवंत राहील का? हा तुमच्या-आमच्या समोरील खरा प्रश्न आहे.आनंदराव कासोटे, माजी सरपंच, सांगरूळ