शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:22 IST

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे ...

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे सरपंच व विकास संस्थेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मारुतराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक निवडणुका अगदी जवळून पाहिल्या. त्यातील, सन १९७८ला सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आठवणीत राहण्यासारखी होती. कॉँग्रेसच्या फुटीनंतर एस कॉँग्रेसतर्फे श्रीपतराव बोंद्रे, राष्टÑीय कॉँग्रेसकडून मारुतराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते उभे होते. तत्कालीन राजकारणातील हे तीन दिग्गज एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असले तरी प्रचारात ईर्ष्या असायची पण द्वेष नसायचा, तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. मारुतराव खाडे यांची प्रचारयंत्रणा जरा वेगळी होती. सांगरूळसह बारा वाड्यांतील लोकं सकाळी उठून स्वत:च्या घरातून भाकरी बांधून प्रचारात सक्रिय व्हायचे. प्रचारासाठी आलिशान गाड्यांसह इतर सुविधा नव्हत्या. उलट मतदारसंघातील लोकांनीच खाडे यांना वर्गणी गोळा करून खर्चासाठी पैसे दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचारासाठी पैसे मागून घेण्याचा प्रश्नच नव्हता. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी मिळेल त्या वाहनांतून गावोगावी जायचे आणि प्रचार करायचा. पार्टीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे आठ-दहाजण तर पंधरा-पंधरा दिवस त्या-त्या भागातच तळ ठोकत होते. तेथेच कार्यकर्त्यांच्या घरात जेवायचे आणि त्या परिसरात प्रचार करत. उमेदवार त्या भागात प्रचारास गेला की मग त्यांची भेट व्हायची, या भागात कोणाला दुरूस्त करावे लागेल. याचा अहवाल दिला जायचा. त्या रात्री बसूनच पुढची रणनीती ठरवली जायची. एक-एक कार्यकर्ता तर निवडणूक संपेपर्यंत घराचे तोंड बघत नव्हते, इतकी निष्ठा नेत्यांवर असायची. तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारानिमित्त एकत्र यायचे पण कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद नसायचा. उलट ‘तुम्ही जोरात हाय, आमची काय डाळ शिजतीय’ असे बोलून वातावरण खेळीमेळीचे व्हायचे. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली तरी कुठेही संघर्ष झाला नाही. दुसऱ्या दिवशी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये मतमोजणी होती. काट्याची टक्कर असल्याने उमेदवारांसह मतमोजणी प्रतिनिधींवर कमालीचा तणाव होता. यामध्ये श्रीपतराव बोंद्रे हे थोड्या मतांनी विजयी झाले पण उमेदवारांनी खेळीमेळीत एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.या निवडणुका कोठे आणि आताच्या कुठे? आज निष्ठा म्हणजे काय असते? हे सांगण्याची वेळ आली आहे. त्याला एकटे कार्यकर्तेच जबाबदार आहेत, असे नाही, तर नेतेही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक निवडणुकीत दडपशाहीचे राजकारण करायचे, येनकेन प्रकारे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. हे टार्गेट ठेवून द्वेषाचे राजकारण सुरू आहे. परिणामी, खुल्या वातावरणात निवडणुका होत नाहीतच पण वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुकांमुळे लोकशाही जिवंत राहील का? हा तुमच्या-आमच्या समोरील खरा प्रश्न आहे.आनंदराव कासोटे, माजी सरपंच, सांगरूळ