शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

संस्थांच्या निवडणुका तालुकास्तरावर व्हाव्यात

By admin | Updated: December 30, 2014 23:41 IST

दूध, सेवा संस्थांची मागणी : खर्चिक आणि वेळकाढू असणारी प्रक्रिया बदलण्याची गरज

संजय पारकर- राधानगरी -जिल्हास्तरावरून होणाऱ्या प्राथमिक दूध व विकास सेवा संस्थांच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय कोल्हापूरऐवजी तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयात ठेवावे, अशी मागणी या संस्थांमधून होत आहे. असे झाल्यास वेळ व पैशाची बचत होऊन मनस्तापही कमी होणार आहे.दोन वर्षांपासून रेंगाळलेली सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत सुरू आहे. ‘ड’ व ’क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका तालुका निबंधकांच्या अखत्यारित सुरू आहेत. मात्र, सर्वच दूध संस्थांसाठी जिल्हास्तरावर सहायक निबंधक कार्यालय असल्याने या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जिल्ह्यातील सुमारे १२५ दूध संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय कोल्हापुरातील या कार्यालयात राहणार आहे.त्याचबरोबर दहा लाखांवर भांडवल असणाऱ्या प्राथमिक विकास संस्था ‘ब’ वर्गात मोडतात. त्यांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर यांच्या स्तरावरून सुरू आहे. या संस्थांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांचे नियंत्रण याच स्तरावरून होणार असल्याने या निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय तेथेच राहणार आहे.या दूध व सेवासंस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांना निवडणूक कार्यक्रमादरम्यान वारंवार कोल्हापुरात जावे लागणार आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांचे कोल्हापूरपासूनचे अंतर, विस्तार याचा विचार करता ही प्रक्रिया मोठी खर्चिक व वेळकाढू ठरणार आहे. शिवाय यासाठी होणारा मनस्ताप लक्षात घेता सर्वसामान्य सभासद निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणार आहेत. ज्या उद्देशाने सहकार निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करून त्यांच्यामार्फत निवडणुका घेण्यात येत आहेत, तो उद्देशच यामुळे असफल होणार आहे.जास्तीत जास्त सभासदांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल, तर ही प्रक्रिया तालुकास्तरावर होणे आवश्यक आहे. तरच वेळ व पैसाही वाचणार आहे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी सहकारी संस्थांतून होत आहे.