शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे

By admin | Updated: May 29, 2016 01:12 IST

वसंत भोसले : समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यान

इचलकरंजी : प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. तेथील अर्थकारण, राजकारण, व्यवसाय, व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आता झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे. दोन लोकसभेच्या निवडणूक कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकींच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून निघतो. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवरून देशाचा कल ठरवणे अवघड आहे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. भोसले म्हणाले, सन २०१४ ते २०१९ या लोकसभेच्या कालावधीमध्ये २९ राज्ये व दोन केंद्रशासित अशा ३१ विधानसभा निवडणुका होतात. त्यातील चार राज्यांच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर होतात. उर्वरित २७ पैकी आतापर्यंत १२ विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, तर १५ विधानसभेच्या निवडणुका अजून होणार आहेत. आता झालेल्या निवडणुकांचे निकाल हे तेथील सार्वजनिक वितरण व्यवस्था व परिस्थिती यावर मिळालेले यश आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार आणि मागील सरकार यांच्या धोरणात्मक निर्णयात अद्याप तरी काहीच फरक दिसत नाही. व्यक्तीच्या वातावरणाचा फरक पाहावयाचा झाल्यास, एकवेळ प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या चंद्राबाबूंनाही पराभव स्वीकारावा लागला. हा इतिहास पाहता देशात व्यक्तिकेंद्रित प्रभाव टिकून राहत नसल्याचे दिसून येते. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होत असलेल्या उपक्रमांमधूनही भारत आता काँग्रेसमुक्त होतो आहे असे दाखविले जात आहे, ते वास्तव नाही. कारण काही राज्यांच्या निवडणुकांवरून तसा अर्थ काढला जाऊ शकत नाही. अमर पटेल यांनी आभार मानले.