शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे

By admin | Updated: May 29, 2016 01:12 IST

वसंत भोसले : समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यान

इचलकरंजी : प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. तेथील अर्थकारण, राजकारण, व्यवसाय, व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आता झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे. दोन लोकसभेच्या निवडणूक कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकींच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून निघतो. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवरून देशाचा कल ठरवणे अवघड आहे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. भोसले म्हणाले, सन २०१४ ते २०१९ या लोकसभेच्या कालावधीमध्ये २९ राज्ये व दोन केंद्रशासित अशा ३१ विधानसभा निवडणुका होतात. त्यातील चार राज्यांच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर होतात. उर्वरित २७ पैकी आतापर्यंत १२ विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, तर १५ विधानसभेच्या निवडणुका अजून होणार आहेत. आता झालेल्या निवडणुकांचे निकाल हे तेथील सार्वजनिक वितरण व्यवस्था व परिस्थिती यावर मिळालेले यश आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार आणि मागील सरकार यांच्या धोरणात्मक निर्णयात अद्याप तरी काहीच फरक दिसत नाही. व्यक्तीच्या वातावरणाचा फरक पाहावयाचा झाल्यास, एकवेळ प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या चंद्राबाबूंनाही पराभव स्वीकारावा लागला. हा इतिहास पाहता देशात व्यक्तिकेंद्रित प्रभाव टिकून राहत नसल्याचे दिसून येते. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होत असलेल्या उपक्रमांमधूनही भारत आता काँग्रेसमुक्त होतो आहे असे दाखविले जात आहे, ते वास्तव नाही. कारण काही राज्यांच्या निवडणुकांवरून तसा अर्थ काढला जाऊ शकत नाही. अमर पटेल यांनी आभार मानले.