शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे

By admin | Updated: May 29, 2016 01:12 IST

वसंत भोसले : समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यान

इचलकरंजी : प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. तेथील अर्थकारण, राजकारण, व्यवसाय, व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आता झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे. दोन लोकसभेच्या निवडणूक कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकींच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून निघतो. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवरून देशाचा कल ठरवणे अवघड आहे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. भोसले म्हणाले, सन २०१४ ते २०१९ या लोकसभेच्या कालावधीमध्ये २९ राज्ये व दोन केंद्रशासित अशा ३१ विधानसभा निवडणुका होतात. त्यातील चार राज्यांच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर होतात. उर्वरित २७ पैकी आतापर्यंत १२ विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, तर १५ विधानसभेच्या निवडणुका अजून होणार आहेत. आता झालेल्या निवडणुकांचे निकाल हे तेथील सार्वजनिक वितरण व्यवस्था व परिस्थिती यावर मिळालेले यश आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार आणि मागील सरकार यांच्या धोरणात्मक निर्णयात अद्याप तरी काहीच फरक दिसत नाही. व्यक्तीच्या वातावरणाचा फरक पाहावयाचा झाल्यास, एकवेळ प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या चंद्राबाबूंनाही पराभव स्वीकारावा लागला. हा इतिहास पाहता देशात व्यक्तिकेंद्रित प्रभाव टिकून राहत नसल्याचे दिसून येते. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होत असलेल्या उपक्रमांमधूनही भारत आता काँग्रेसमुक्त होतो आहे असे दाखविले जात आहे, ते वास्तव नाही. कारण काही राज्यांच्या निवडणुकांवरून तसा अर्थ काढला जाऊ शकत नाही. अमर पटेल यांनी आभार मानले.