शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे

By admin | Updated: May 29, 2016 01:12 IST

वसंत भोसले : समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यान

इचलकरंजी : प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. तेथील अर्थकारण, राजकारण, व्यवसाय, व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आता झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे. दोन लोकसभेच्या निवडणूक कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकींच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून निघतो. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवरून देशाचा कल ठरवणे अवघड आहे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. भोसले म्हणाले, सन २०१४ ते २०१९ या लोकसभेच्या कालावधीमध्ये २९ राज्ये व दोन केंद्रशासित अशा ३१ विधानसभा निवडणुका होतात. त्यातील चार राज्यांच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर होतात. उर्वरित २७ पैकी आतापर्यंत १२ विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, तर १५ विधानसभेच्या निवडणुका अजून होणार आहेत. आता झालेल्या निवडणुकांचे निकाल हे तेथील सार्वजनिक वितरण व्यवस्था व परिस्थिती यावर मिळालेले यश आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार आणि मागील सरकार यांच्या धोरणात्मक निर्णयात अद्याप तरी काहीच फरक दिसत नाही. व्यक्तीच्या वातावरणाचा फरक पाहावयाचा झाल्यास, एकवेळ प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या चंद्राबाबूंनाही पराभव स्वीकारावा लागला. हा इतिहास पाहता देशात व्यक्तिकेंद्रित प्रभाव टिकून राहत नसल्याचे दिसून येते. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होत असलेल्या उपक्रमांमधूनही भारत आता काँग्रेसमुक्त होतो आहे असे दाखविले जात आहे, ते वास्तव नाही. कारण काही राज्यांच्या निवडणुकांवरून तसा अर्थ काढला जाऊ शकत नाही. अमर पटेल यांनी आभार मानले.