शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

निवडणूक दिवाळी आधी की नंतर हा गुंता

By admin | Updated: August 17, 2014 00:54 IST

सरकार व आयोगामध्ये मतभिन्नता : त्यावरच लागू होणार आचारसंहिता

विश्वास पाटील /  कोल्हापूरविधानसभेची निवडणूक दिवाळीच्या आधी होणार की नंतर यावरच आचारसंहिता कधी लागू होणार याची तारीख निश्चित होणार आहे. तोच गुंता न सुटल्याने आचारसंहिता कधी लागू होणार याबद्धल संभ्रमावस्था तयार झाल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मतदान दिवाळी झाल्यानंतर व्हावे असे वाटते. कारण महाराष्ट्र विधानसभेची मुदत ७ डिसेंबरपर्यंत आहे. दिवाळी २४ आॅक्टोबरला आहे. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर मतदान झाले तरी नवे सभागृह मुदतीत अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे आताच आचारसंहिता लागू करण्याची घाई न केली जाऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना वाटते, असे सूत्रांचे म्हणणे आहे; परंतु निवडणूक आयोग निवडणूक दिवाळीपूर्वीच व्हावी अशा प्रयत्नात आहे. दसरा ३ आॅक्टोबरला आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीमध्ये कधीतरी मतदान होणार असेल तर आचारसंहिता २१ किंवा २२ आॅगस्टला लागू होऊ शकते, अशा हालचाली आहेत.सहकार संस्थांच्या निवडणुकीचा निर्णयही याच निर्णयाशी निगडीत आहे. राज्य सरकारला या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर हव्या आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार या निवडणुका घेण्यासाठी शासनाने सहकार निवडणूक प्राधिकरणही स्थापन केले आहे. त्याचे आयुक्त म्हणून मधुकर चौधरी यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सुमारे ४५ कर्मचारी दिले आहेत. प्राधिकरणासाठी सहनिबंधक म्हणून वाडेकर यांची नियुक्तीही केली आहे. अतिरिक्त निबंधक पद मात्र अजून भरलेले नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्राधिकरणाचा कारभार ज्याआधारे चालणार आहे, त्या निवडणूक नियमांना अजून मंजुरी मिळालेली नाही. हे नियम सहकार खात्याने तयार करून शासनाकडे पाठविले. त्यास शासनानेही मंजुरी दिली आहे; परंतु त्यावर जोपर्यंत राज्यपालांची सही होत नाही तोपर्यंत ते लागू होत नाहीत. त्यावर ज्यादिवशी राज्यपालांची सही होईल त्याच दिवसांपासून हे नियमही लागू होतील. तसेच त्या निवडणूक प्राधिकरणाचे कामही सुरू होईल. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी एक दिवस हे नियम लागू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत सहकार निवडणूक प्राधिकरण या संस्थांच्या निवडणुकीची तयारी करू शकते. विधानसभेला आपल्या ताब्यातील या संस्थांचा उपयोगही करता येऊ शकतो. त्यानंतर काय व्हायचे ते होईल, असा हिशेब सरकारने केला आहे. राज्यातील सुमारे वीस जिल्हा बँका, साखर कारखाने व गोकुळ दूध संघांसह अनेक संघाची निवडणूक होणार आहे. या संस्था आता दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात आहेत.