शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

तीन कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगुल

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

जिल्ह्याचा पश्चिम भाग : साखर सह. संचालक कार्यालयात संभाव्य निवडणुकीच्या आराखड्यावर आज चर्चा

प्रकाश पाटील - कोपार्डे -राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) व भोगावती (परिते) या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. संभाव्य निवडणूक आराखड्यासाठी प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर येथे कारखाना प्रशासनाबरोबर नियोजनात्मक दृष्टीने चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलाविली आहे. येत्या मे ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.जिल्ह्यातील कुंभी-कुडित्रे, दूधगंगा-वेदगंगा (परिते), भोगावती (परिते) या साखर कारखान्यांमध्ये आजी-माजी आमदारांच्या सत्ता आहेत. विधानसभेला ‘कुंभी’चे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना यश मिळविताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, तर ‘बिद्री’चे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. या तिन्ही साखर कारखान्यांमध्ये राजकीय सांगड असून, राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून या तिन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते.कुंभी-कासारी कारखान्यावर दहा वर्षांपासून नरके यांची निर्विवाद सत्ता आहे, तर त्यांनी ‘भोगावती’त राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेऊन आपले विधानसभेचे विरोधक पी. एन. पाटील यांना सत्तेतून पायउतार करताना दोनवेळा आमदारकीही काबीज केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राजकीय ईर्ष्येने पेटून उठले आहेत. त्यादृष्टीने कुंभी-कासारी व भोगावतीमध्ये राजकीय समीकरणे व ध्रुवीकरण करण्यास पी. एन. पाटील गट सक्रिय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांना सहकारी म्हणून घेण्यास काँग्रेस कार्यकर्ते उत्सुक आहेत.‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी चंद्रदीप नरके यांना मदत केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राधानगरीमध्ये के. पीं.च्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांना बळ देत विजयी केले. आता बिद्रीच्या राजकारणातही के. पीं. विरोधात आबिटकर अशी ताकद उभा करून पी. एन. पाटील यांच्या विरोधात विधानसभेला केलेल्या विरोधी खेळीचा वचपा काढण्याचाही काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.तिन्ही कारखान्यांची राजकीय सांगड असल्यामुळे येत्या काळात कारखान्यांच्या निवडणुकीतून करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल या सहा तालुक्यांतील राजकीय वातावरण तापणार आहे.