शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

तीन कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगुल

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

जिल्ह्याचा पश्चिम भाग : साखर सह. संचालक कार्यालयात संभाव्य निवडणुकीच्या आराखड्यावर आज चर्चा

प्रकाश पाटील - कोपार्डे -राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) व भोगावती (परिते) या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. संभाव्य निवडणूक आराखड्यासाठी प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर येथे कारखाना प्रशासनाबरोबर नियोजनात्मक दृष्टीने चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलाविली आहे. येत्या मे ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.जिल्ह्यातील कुंभी-कुडित्रे, दूधगंगा-वेदगंगा (परिते), भोगावती (परिते) या साखर कारखान्यांमध्ये आजी-माजी आमदारांच्या सत्ता आहेत. विधानसभेला ‘कुंभी’चे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना यश मिळविताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, तर ‘बिद्री’चे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. या तिन्ही साखर कारखान्यांमध्ये राजकीय सांगड असून, राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून या तिन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते.कुंभी-कासारी कारखान्यावर दहा वर्षांपासून नरके यांची निर्विवाद सत्ता आहे, तर त्यांनी ‘भोगावती’त राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेऊन आपले विधानसभेचे विरोधक पी. एन. पाटील यांना सत्तेतून पायउतार करताना दोनवेळा आमदारकीही काबीज केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते राजकीय ईर्ष्येने पेटून उठले आहेत. त्यादृष्टीने कुंभी-कासारी व भोगावतीमध्ये राजकीय समीकरणे व ध्रुवीकरण करण्यास पी. एन. पाटील गट सक्रिय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांना सहकारी म्हणून घेण्यास काँग्रेस कार्यकर्ते उत्सुक आहेत.‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी चंद्रदीप नरके यांना मदत केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राधानगरीमध्ये के. पीं.च्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांना बळ देत विजयी केले. आता बिद्रीच्या राजकारणातही के. पीं. विरोधात आबिटकर अशी ताकद उभा करून पी. एन. पाटील यांच्या विरोधात विधानसभेला केलेल्या विरोधी खेळीचा वचपा काढण्याचाही काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.तिन्ही कारखान्यांची राजकीय सांगड असल्यामुळे येत्या काळात कारखान्यांच्या निवडणुकीतून करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल या सहा तालुक्यांतील राजकीय वातावरण तापणार आहे.