शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीचा निवडणूक खर्च जाणार दोन कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 16:51 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नव्याने विधेयक आणले असून त्याला विधानसभेत मान्यता देण्यात आली. या विधेयकामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होणार असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी किमान दोन कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे समित्यांचे कंबरडे मोडणारच पण त्याबरोबर कमकुवत समित्या आर्थिक अरिष्टात सापडणार आहेत.

ठळक मुद्देविधेयक बदलाचा फटका पावणेतीन लाख शेतकरी मतदान प्रक्रियेतप्रचारासाठी लोकसभेचे कार्यक्षेत्र !विधान परिषदेत विधेयक बारगळणार

कोल्हापूर : राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नव्याने विधेयक आणले असून त्याला विधानसभेत मान्यता देण्यात आली. या विधेयकामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होणार असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी किमान दोन कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे समित्यांचे कंबरडे मोडणारच पण त्याबरोबर कमकुवत समित्या आर्थिक अरिष्टात सापडणार आहेत.

सध्या बाजार समित्यांच्या निवडणुका विकास संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल-तोलाईदार या गटांत होतात. विकास संस्था व ग्रामपंचायत सदस्यांना मतांचा अधिकार आहे. कोल्हापूर बाजार समितीचा विचार करायचा म्हटल्यास विकास संस्था व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी-अडते-हमाल-तोलाईदार असे सुमारे २२ हजार मतदान आहे. दोन वर्षांपूर्वी १९ जागांसाठी निवडणूक झाली त्यासाठी सुमारे २६ लाख खर्च आला होता. आता नवीन विधेयकानुसार दहा गुंठे क्षेत्र असणारा व पाच वर्षांत तीनवेळा शेतीमाल समितीमध्ये पाठविणाºया शेतकºयांना मताचा अधिकार मिळणार आहे. कोल्हापूर बाजार समितीचे करवीर, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी व कागल निम्मा तालुका असे कार्यक्षेत्र आहे. या तालुक्यात दहा गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र असलेले सुमारे पावणेतीन लाख शेतकरी आहेत.

साडेसहा तालुक्यात मतदान केंद्रे उभा करावी लागणार, तेवढी कर्मचाºयांसह इतर यंत्रणा लागणार आहे. त्यामुळे खर्च किमान दोन कोटीपर्यंत जाऊ शकतो. सक्षम बाजार समित्या या खर्चाने आतबट्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन विधेयक शेतकºयांच्या दृष्टीने जरी चांगले असले तरी समित्यांना अडचणीचे ठरणार आहे.प्रचारासाठी लोकसभेचे कार्यक्षेत्र !

लोकसभा मतदारसंघात सहा तालुके येतात. बाजार समितीसाठी साडेसहा तालुके आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे घरोघरी प्रचारयंत्रणा राबवावी लागणार असल्याने उमेदवारांची दमछाक उडणार हे निश्चित आहे.विधान परिषदेत विधेयक बारगळणारविधानसभेत भाजप-शिवसेनेचे बहुमत असल्याने विधेयक अवाजवी मताने सहमत झाले; पण सरकारची विधान परिषदेत कसोटी लागणार आहे. येथे काँग्रेस, राष्टÑवादीचे वर्चस्व असल्याने येथे विधेयक बारगळण्याची शक्यता आहे.पाच वर्षे कर्ज परतफेडीतच

नवीन निर्णयामुळे कमकुवत समित्यांचे तर कंबरडे मोडणार आहे. त्यांना निवडणुकीसाठी पणन मंडळाकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. निवडून येणाºया संचालकांची विकासकामांऐवजी निवडणुकीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यात पाच वर्षे जाणार आहेत.