शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

जिल्ह्यातील २३६ सरपंचांच्या गुरुवारी निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:06 IST

कोल्हापूर : आरक्षणावरील हरकतीमुळे स्थगित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३६ ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी येत्या गुरुवारी (दि.२५) होत ...

कोल्हापूर : आरक्षणावरील हरकतीमुळे स्थगित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३६ ग्रामपंचायतींतील सरपंच, उपसरपंचांच्या निवडी येत्या गुरुवारी (दि.२५) होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भूदरगडमधील आरक्षण बदलणाऱ्या ६० ग्रामपंचायती वगळून या निवडी होणार आहेत. या गावांच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम आरक्षण जाहीर झाल्यानंतरच होणार आहे. दरम्यान भूदरगडच्या फेरआरक्षण सोडतीचा आदेश सोमवारी (दि.२२) काढला जाणार आहे.

जिल्ह्यात निवडणूक झालेल्या ४३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडीचा कार्यक्रम ९ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला होता; पण पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, शिरोळ, शाहूवाडी, भूदरगड या सहा तालुक्यांतील ९ गावांनी आरक्षण सोडतीवर हरकत घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या निवडी १६ पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. दरम्यान न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या सर्व गावांची सुनावणी प्रक्रिया करून निकाल दिला.

यात भूदरगड तालुक्यातील फणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण बदलल्याने तेथील ६० गावांतील सरपंचपदाचे फेरआरक्षण निघणार आहे. उर्वरित सर्व आठ गावांतील हरकती फेटाळल्या आहेत. त्यामुळे सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अपेक्षेप्रमाणे गुरुवारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीत निवड सभा घेऊन या निवडी पूर्ण कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. आरक्षण सोडत निघाल्याच्या ३० दिवसांच्या आत निवडी करणे बंधनकारक असल्यानेच हा निवड कार्यक्रम तातडीने घेण्यात आला आहे.

चौकट ०१

भूदरगडमधील ७६ पैकी ६० गावांतील सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द झाल्याने सरपंचपदाचे फेरआरक्षण निघणार असल्याने उर्वरित १६ गावांतच निवडणूक होणार आहे. करवीर ५४, शाहूवाडी ४१, शिरोळ ३३, गडहिंग्लज ५०, पन्हाळा ४२ अशा एकूण २३६ गावांतील सरपंच, उपसरपंच निवडी होत आहेत.

चौकट ०२

सरपंच निवडीवरील स्थगिती उठल्याने आणि निवड कार्यक्रम जाहीर झाल्याने या २३६ गावांमध्ये आता राजकीय वातावरण तापणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. पी.एन. पाटील, आ. विनय कोरे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या तालुक्यात आता पुढील सात दिवस प्रतिष्ठेचे असतील. या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपापल्या तालुक्यात सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत; पण आता सरपंच निवड करताना प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.