शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

वित्त आयोगाच्या निधी वाटप वादावर आठ महिन्यांनी पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा समान निधी वाटपाचा शब्द आणि सदस्यांच्या भावनांचा आदर करून तक्रारदार वंदना मगदूम यांनी ...

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा समान निधी वाटपाचा शब्द आणि सदस्यांच्या भावनांचा आदर करून तक्रारदार वंदना मगदूम यांनी मुंबई उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची कार्यवाही बुधवारी सुरू केली व त्यानुसार इचलकरंजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. आज गुरुवारी ते मुंबईला पाठवले जाणार असून, ३ मार्चच्या आत ही याचिका रद्द होणार आहे. या निर्णयामुळे १५ व्या वित्त आयोगावरून गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला न्यायालयीन व जिल्हा परिषद स्तरावरील संघर्ष संपुष्टात आला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या १२ कोटींच्या निधी वाटपात पदाधिकारी व सत्ताधाऱ्यांनी जास्त निधी घेऊन विरोधकांना डावलले होते. यावरून ऑगस्टमध्ये माजी महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांच्या वतीने माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी समान वाटपाची पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली. पण त्यांनी न जुमानल्याने २६ जूनच्या शासन परिपत्रकानुसार निधी वाटप करावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ऑगस्टमध्ये याचिका दाखल केल्यापासून गेले आठ महिने बऱ्याच घडामोडी घडल्या. १२ कोटींचा निधी येऊनही तो खर्च करता आला नाही, तो परत जाणार असल्याने अखेर सर्व न्यायालयीन खेळ खेळल्यानंतर अखेर उपाध्यक्ष सतीश पाटील व ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी शिष्टाई करत याचिकाकर्ते व सत्ताधाऱ्यांची बैठक घेतली. मंत्री मुश्रीफ यांनी स्वत: लक्ष घालत सर्वांना समान निधी दिला जाईल, असा शब्द दिला. या बदल्यात याचिका मागे घेण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे बुधवारी वंदना मगदूम यांनी इचलकरंजी न्यायालयात जाऊन याचिका मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र भरून दिले.

चौकट ०१

आणखी १२ कोटी

पंधराव्या वित्त आयोगातू्न जुलैमध्ये जिल्हा परिषदेला १२ कोटींचा निधी आला आहे, आता आणखी १२ कोटींचा निधी चारच दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ९ महिन्यांच्या अंतरात तब्बल २४ कोटी रुपये आले असल्याने सदस्यांना अक्षरशा लॉटरी लागली असून, रखडलेल्या विकासाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

प्रतिक्रिया

सभागृहाचा कार्यकाल संपत आला आहे. निधी नसल्याने विकासकामावर परिणाम होत आहे. आलेला निधीही खर्च करता आला नाही तर मतदारांना काय उत्तर देणार, असा सर्वच सदस्यांचा सूर असल्याने सर्वांच्या भावनेची कदर करून याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राजू मगदूम,

सरपंच माणगाव व याचिकाकर्ते