शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भुदरगडमधील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

By admin | Updated: July 17, 2015 23:07 IST

भुदरगडमधील आठ ग्रामपंचायती बिनविरोध

शिवाजी सावंत - गारगोटीभुदरगड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लागल्या आहेत. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळाले आहे. खऱ्या अर्थाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे हे यश मानावे लागेल. स्थानिक पातळीवर सलोखा राहण्यात यामुळे मदत होईल.गावपातळीवर राजकारणावरून टोकाचा संघर्ष केला जातो. घरापासून बांधापर्यंत हे वाद सुरू असतात. यामध्ये अनेक निष्पाप आणि निरपराध माणसे भरडलेली जातात. हे जाणून स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महत्त्वाकांक्षी असे महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. या अभियानामुळे हजारो खटले निकालात निघाले, तर किरकोळ वाद- विवाद हे स्थानिक स्तरावर सोडविले गेले. याचीच परिणती म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विशेष बक्षीस योजना जाहीर केली. गावा-गावांतील लोकांचा संघर्ष मावळला आणि खऱ्या अर्थाने लोकशाही रुजू लागली.भुदरगड तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मुरुक्टे, म्हासरंग, उकीरभाबळे, सोनुर्ली, वासनोली ही चार गावे बिनविरोध झालीत, तर माघारीच्या अखेरच्या दिवशी बसरेवाडी, नवले, तांब्याचीवाडी, पाळ्याचा हुडा ही आणखी चार गावे बिनविरोध झाली. यामध्ये खानापूर व गंगापूर ही दोन गावे केवळ एक-एक जागेकरिता निवडणूक लागल्याने बिनविरोध होण्यापासून वंचित राहिली. खानापूर हे गाव बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेहनत घेतली पण त्यांना अपयश आले, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांना त्यांचे गंगापूर गाव एक-एक जागेवर निवडणूक लागल्याने बिनविरोध करता आले नाही. याव्यतिरिक्त काही गावांतील ठरावीक जागा बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले आहे. गावाच्या नावापुढील कंसात बिनविरोध सदस्य संख्या नांगरगाव (१), भेंडवडे (२), हेळेवाडी (२), नागणवाडी (२), बेगवडे (१), आदमापूर (१), पंडिवरे (१), लोटेवाडी (१), खेडगे-एरडंवे (२), पाटगाव-मानोपे (१), नितवडे (३), भमदापूर (५), मेघोली (२), मठगाव-मानी (४), नांदोली-करंबळी (१), भालेकरवाडी (५), शिवडाव (६), वळशिवणे (२), खानापूर (८), गंगापूर (८).बिनविरोध झालेली गावे आणि त्यांचे सदस्य नावे पुढीलप्रमाणे - मुरुक्टे येथील अरुण हरी बेलेकर, चंद्रभागा उत्तम फगरे, राणी लक्ष्मण माने, शितल राजाराम जाधव, चंद्रकांत अंबाजी गुरव, मारुती परसू कांबळे, सखुबाई अशोक चव्हाण, बसरेवाडी येथील विठ्ठल पांडुरंग पाटील, वंदना दिनकर पाटील, आक्काताई शंकर साळवी, रवींद्र महादेव देवेकर, अनिल केशव सुतार, साऊताई बाबूराव पाटील, सुवर्णा गणपती ढेरे, म्हासरंग- उकीरभाटले या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी आरती अशोक कोटकर, सुरेखा उमेश कांबळे, बाळकू बापू कांबळे, विजय राजाराम चव्हाण, सविता महादेव पंदारे, मनीषा कृष्णा गुरव, जयदीप विठ्ठल साठे, ननहुबी आदम शेख, शोभा आनंदा धुरी. पाळ्याचा हुडा - संजय बळवंत गुरव, लक्ष्मी जयसिंग शिंदे, हौसाबाई प्रकाश हजाम, संजीवनी संतोष किल्लेदार, नामदेव श्रीपती कांबळे, सरिता श्रावण तेजम, सुरेश तेजम. सोनुर्ली - लक्ष्मी गुंडू कांबळे, बळवंत बाबूराव साळोखे, शिवाजी ईश्वरा काटकर, संगीता पंढरीनाथ महाडिक, नामदेव धोंडिराम पाटील, उज्ज्वला काटकर, सुषमा संभाजी काटकर. वासनोली - मानसिंग पांडुरंग पाटील, प्रियांका संतोष पोवार, गणपती शंकर गुरव, रत्नाबाई शिवाजी कांबळे, मधुकर रामचंद्र पाटील, शोभाताई कुंडलिक पाटील, लक्ष्मी शिवाजी कांबळे, नवले - दशरथ ज्ञानदेव चिले, वनिता सयाजी पाटील, बेबीताई आनंदा रब्बे, तानाजी मारुती देसाई, शिवाजी पाटील. तांब्याचीवाडी - वंदना एकनाथ लाड, प्रकाश आनंदा कांबळे, सुषमा सुरेश भालेराव, सुनील सोमा कांबळे, अस्मिता अशोक भालेकर, कृपा श्रीकृष्ण चौकेकर, प्रकाश काशीराम हाणफोडे.