शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आठशे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 28, 2016 00:11 IST

ठिबक सिंचन योजना : कागल तालुक्यातील २१५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर

जहाँगिर शेख -कागल दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत चालला असल्याने ‘पाणी वाचवा’ ही मोहीम सर्वत्र मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. शेतीसाठीही पाणी देण्याबद्दल वेगवेगळे उपाय योजले गेले आहेत. त्यामध्ये ‘ठिबक सिंचन’ या योजनेला महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने ५० टक्के अनुदानही सुरू केले. असे असताना सन २०१३-२०१४ या मागील वर्षात कागल तालुक्यातील २१५ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान मंजूर होऊन देखील त्यापैकी ५४ जणांनाच हे अनुदान मिळाले आहे. १६१ शेतकरी गेली तीन वर्षे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ८०० शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.२०१३-२०१४चे हे अनुदान आलेले नसताना २०१४-२०१५ आणि चालू वर्ष २०१५-२०१६ साठी मात्र नव्याने मंजुरी मिळत शेतकऱ्यांना हे अनुदान आले आहे. मग २०१३-२०१४ चे अनुदान न देण्यामागे नेमके कारण काय? असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांमधून उमटत आहे. २०१३ मध्ये ठिबक सिंचन कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांना ठिबक सिंचन करण्यास प्रवृत्त करून सर्व कागदपत्रांची पूर्तता, बँक कर्ज, शासन प्रस्ताव, ठिबक सिंचन यंत्रणा यांचा पुरवठा केला आहे. यामुळे कागल तालुक्यात त्यावर्षी २१५ इतके शेतकरी ठिबक सिंचन पद्धत वापरत होते. शासनाचे १० टक्के अनुदान मिळणार यामुळे बँकांचे कर्ज घेतले. एकरी ४५ हजार रुपये खर्च केला. मात्र, गेली तीन वर्षे हे अनुदानच आले नाही.कागल तालुक्यातील या शेतकऱ्यांचे जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचे हे अनुदान थांबले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा आकडा मोठा आहे. २०१४-२०१५ या वर्षात झालेल्या ठिबक सिंचनाचे अनुदान थकीत असताना २०१३ मधले हे अनुदान थांबविले आहे. लाभार्थी शेतकरी कृषी विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारीत आहेत. थकीत अनुदान त्वरित वर्ग करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.२०१३-२०१४ मध्ये ठिबक सिंचनासाठी अल्प अनुदान आल्यामुळे २१५ पैकी ५४ जणांना कागल तालुक्यात हे अनुदान मिळाले. उर्वरित लोकांच्या अनुदानासाठी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. आमच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. जिल्ह्यातही यावर्षी अशी परिस्थिती आहे.-संजय वाघमारे, कागल तालुका, कृषी अधिकारी.शेतकऱ्यांनी संपर्क साधावायेथील दि कागल को-आॅप. बँकेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब भोसले म्हणाले की, २०१३-१४ मध्ये आम्ही कर्जे काढून ठिबक सिंचन केले आहे. मात्र, केवळ आज, उद्या असे आश्वासनच दिले आहे. अनुदानाची रक्कम आली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता अनुदानासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील आणि जिल्हास्तरावरील संबंधित शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. दरम्यान, पुढील दिशा ठरविण्यासाठी कागलमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.