शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

लाखोंच्या संख्येने उदगावात इज्तेमा

By admin | Updated: April 1, 2016 01:32 IST

विश्वशांती, दुवा पठण, ५० विवाह सोहळा : पाच लाखांहून अधिक मुस्लिम बांधवांची हजेरी

जयसिंगपूर : उदगाव (ता़ शिरोळ) येथे जगाच्या विश्वशांतीसाठी इज्तेमा या पवित्र कार्यक्रमाचे (बुधवार, दि. ३० व गुरुवार, दि. ३१) दोन दिवस आयोजन करण्यात आले होते़ रात्री नऊ वाजता हाफिज मन्सूर यांच्या उपस्थितीत ५० विवाह, सामूहिक जप हे धार्मिक कार्यक्रम झाले़ इज्तेमामध्ये दुवा पठण व विश्वशांतीसाठी नमाज पठण करण्यात आले़ यावेळी पाच लाखांहून अधिक मुस्लिम बांधवांनी कोल्हापूर, सांगली व कर्नाटक सीमाभागातून हजेरी लावली होती़ मनुष्याला जगण्यासाठी परमेश्वराने मोठे वरदान दिले आहे. प्रत्येक मनुष्याने माणुसकी जपण्यासाठी विचार करून समभाव बंधूसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ आई-वडिलांचा आदर राखून प्रत्येकाला मानसन्मान व मदत करावी. माणसांमध्ये बंधुत्व टिकण्यासाठी देशात शांततेची गरज आहे, असे प्रतिपादन हाफिज मन्सूर (पुणे) यांनी केले़ गुरुवारी सकाळी आठ वाजता युसूफभाई एस.टी. (औरंगाबाद), दुपारी २ ते ५ अफसरभाई (पुणे), सायंकाळी ५ वाजता मौलाना सैय्यब (मुंबई) यांनी दिवसभरात विश्वशांततेसाठी महत्त्वाचे संदेश दिले़ गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी दाखल होत होते, तर विविध तालुक्यांप्रमाणे नमाज पठणसाठी सुसज्ज सोय करण्यात आली होती़ तसेच विभागाप्रमाणे भोजनाची सोय करण्यात आली होती़ दरम्यान, गुरुवारी दिवसभरात शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावली होती़ ४० एकर परिसरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व मोठी वाहने अशा वेगवेगळ्या स्वरूपात पार्किंगची सुविधा करण्यात आली होती़ यावेळी इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी, जयसिंगपूर विभागाचे उपअधीक्षक रमेश सरवदे यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, शिरोळचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत बागल, पेठवडगावचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी) अडथळा नाही : सुसज्ज वाहतूक व्यवस्थासायंकाळी सहा वाजल्यापासून पोलिस अधीक्षक संदीप देशपांडे यांच्या आदेशानुसार सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अंकली टोल नाका जैनापूर मार्गे वळविण्यात आली होती, तर कोल्हापूरहून येणारी वाहतूक ही तमदलगे बायपासमार्गे सोडण्यात येत होती़ इचलकरंजी व जयसिंगपूरहून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना जयसिंगपूर रेल्वे स्टेशनमार्गे रात्री उशिरापर्यंत सोडण्याचे काम सुरू होते़ त्यामुळे वाहतुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही़