शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेल्स कोल्हापुरात सुरू व्हावीत असे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोल्हापूरचा पर्यटनाच्या अंगाने विकास व्हायचा असेल तर येथे पंचतारांकित हॉटेल्स सुरू व्हायला हवीत त्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचे ...

कोल्हापूर : कोल्हापूरचा पर्यटनाच्या अंगाने विकास व्हायचा असेल तर येथे पंचतारांकित हॉटेल्स सुरू व्हायला हवीत त्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गुरुवारी येथे सांगितले. केरळच्या धर्तीवर कोल्हापूरचेही पर्यटनाचे मॉडेल विकसित व्हावे असे आमचे प्रयत्न असून त्यात जिल्हा प्रशासनाचा सहभाग कमी असेल. कोल्हापूरनेच त्यात पुढाकार घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हॉटेल व्यवसायातील नामांकित ब्रँड कोल्हापुरात आले तर त्यातूनही पर्यटनाच्या जागतिक नकाशावर जाण्याची संधी असते. सर्वच स्तरांतील पर्यटकांना सामावून घेईल अशी उत्तम हॉटेल व्यवस्था ही पर्यटन विकासाची मूलभूत गरज आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारपासून पर्यटन सप्ताह सुरू होत आहे. जिल्ह्यातील ३० पर्यटने स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या आठवड्यात त्या स्थळांना भेटी देऊन पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा आराखडा करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील प्रमुख वृत्तपत्रांतील ज्येष्ठ बातमीदारांशी संवाद साधला व कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, या आठवड्यात आम्ही पर्यटन विकासाची पायाभूत तयारी करण्याचे नियोजन केले आहे. सध्या कोरोनाचे निर्बंध असल्याने पर्यटनास व अंबाबाई दर्शनास बंदी आहे. त्याचा उपयोग करून आम्ही पर्यटनाचा कृती आराखडा निश्चित करू. त्या ठिकाणी अजून काय करायला हवे याची माहिती घेऊ.. त्यासाठी हॉटेल मालक संघापासून ते क्रीडाईपर्यंत अनेक संस्था, संघटना, व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. कोल्हापुरात जे जे समृद्ध आहे, ते ते जगाच्या नकाशावर कसे नेता येईल यावर आमचा भर आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही या कामासाठी निधीचे नियोजन केले आहे. या कामांत लोकांची मानसिकता बदलून पर्यटन संस्कृती विकसित करण्यात माध्यमांची भूमिका फारच महत्त्वाची ठरू शकते.

यावर भर...

अधिकारी बदलले म्हणून पर्यटन विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असे होऊ नये. ते कोल्हापूरच्याच लोकांनी पुढे विकसित केले पाहिजे असा गाभा नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले.