शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

कोल्हापूरला आयटी पार्कसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST

कागल : यापूर्वीचे फडणवीस सरकार उत्सवप्रियच जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांची गुंतवणूक लाखो कोटींच्या आकड्यात फक्त जाहीर ...

कागल : यापूर्वीचे फडणवीस सरकार उत्सवप्रियच जास्त होते. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांची गुंतवणूक लाखो कोटींच्या आकड्यात फक्त जाहीर केली. त्याचे पुढे काहीच झाले नाही. आमचे ठाकरे सरकार जमिनीवर पाय ठेवून काम करीत आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योगधंद्यांच्या बाबतीत झाली आहे. कोल्हापुरातदेखील मोठी गुंतवणूक होत असून, नजीकच्या काळात सर्व तपशील जाहीर करू. कोल्हापूरला आयटी पार्क बनविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

केनवडे, ता. कागल येथील अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्सच्या चाचणी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, अरुण भाई दुधवडकर, विजय देवणे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार पी.एन. पाटील होते.

देसाई म्हणाले, सध्या जगभरात साखरेऐवजी गुळाला मागणी आहे. संजय घाटगे यांनी दूरदृष्टी दाखवून हा प्रकल्प सुरू केला आहे. शासन या प्रकल्पाच्या पाठीशी उभे आहे. स्वागत जि.प. सदस्य अंबरीश घाटगे यांनी केले.

प्रास्ताविकात संजय घाटगे म्हणाले, केनवडे व्हनाळी हा परिसर अत्यंत गरीब अवस्थेत होता. अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून परिसर हिरवागार झाला. आता या साखर कारखान्याच्या उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी येईल.

हसन मुश्रीफ म्हणाले, हा चाचणी हंगाम घेतल्यानंतर पुढील वर्षी पूर्ण क्षमतेने साखर कारखाना चालेल. लवकरच कर्जमुक्त होऊन मोठ्या साखर कारखान्यात याचे रूपांतर होईल. मी दिलदार मित्राच्या पाठीशी हिमालयसारखा उभा आहे. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार पी.एन. पाटील यांची भाषणे झाली. आभार माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी मानले.

उद्धव ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री

सुभाष देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे हे देशात नंबर एकचे मुख्यमंत्री असल्याचे एका सर्वेक्षणात जाहीर झाले आहे. संजय घाटगे यांचा अनेकदा पराभव झाला; पण ते निराश न होता सामान्य लोकांसाठी कार्यरत आहेत. हसन मुश्रीफ हे गोरगरिबांसाठी मसिहा आहेत. मुंबईत मला लोक सांगतात की, कागल तालुक्यातल्या लोकांना आजाराची काळजी वाटत नाही. कारण हसन मुश्रीफ सर्व उपचार मोफत करून देतात.

१३ केवनडे

फोटो ओळी

केनवडे येथे अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स प्रथम गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे आदी उपस्थित हाेते.